शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ

By admin | Updated: May 17, 2014 00:23 IST

काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात झालेल्या लढतीत तडस यांनी तब्बल २ लाख १५ हजार ७८३ मतांची विक्रमी आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या

वर्धा : काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात झालेल्या लढतीत तडस यांनी तब्बल २ लाख १५ हजार ७८३ मतांची विक्रमी आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघात भगवा फडकाविला. तडस यांना तब्बल ५ लाख ३७ हजार ५१८ इतकी मते मिळाली, तर सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार मते मिळाली. ही मते २00९ च्या तुलनेत ३१ हजार ११८ मतांनी कमीच आहे.

तिसर्‍या क्रमांकावर बसपाचे चेतन पेंदाम यांना ९0 हजार ८६६ मतांवरच समाधान मानावे लागले. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. त्यांना १५ हजार ७३८ मतांवरच आपला गाशा गुंडाळावा लागला. स्थानिक एफसीआयच्या गोडावूनमध्ये सकाळी ८.३0 वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ९ वाजता पहिल्या फेरीचे मतदान हाती आले. पहिल्या फेरीतच भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनी तब्बल ८ हजार ८८८ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी फेरीगणिक वाढतच गेल्याने सागर मेघे यांचा पराभव आणखीच गडद होत गेला. २६ व्या अंतिम फेरीपर्यंत तडस यांची आघाडी २ लाख १५ हजार ७८३ पर्यंत गेली. अंतिम आकडेवारी येताच तडस यांना निवडणूक निर्णय अधिकारी एन. नवीन सोना यांनी विजयी घोषित केले. २00९ च्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार बिपीन कंगाले यांनी तब्बल १ लाख ३१ हजार ६८३ मते घेतली होती. या निवडणुकीत बसपाचे उमेदवार चेतन पेंदाम तिसरा क्रमांक अबाधित राखण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना मताधिक्य टिकविण्यात मात्र अपयश आले. चवथ्या क्रमांकावर आपचे अलीम पटेल असले तरी त्यांना अपेक्षेपेक्षा यश मिळविता आले नाही. निवडणूक निकालावर दृष्टी फिरविल्यास जिल्ह्यात चौफेर मोदीचीच जादू असल्याचे निकालातून दिसून आले. वर्धा लोकसभा मतदार संघातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तडस यांना सर्वाधिक ५६ हजार ११, तर मोर्शीत ५१ हजार ८७१ आघाडी मिळाली. धामणगाव २५ हजार ४२१, वर्धा ३६ हजार २७९ आणि देवळी विधानसभा क्षेत्रातून ३0 हजार ५२६ मतांची भर त्याच्या खात्यात पडली. आर्वीत भाजपाचे आमदार असताना मात्र येथे सर्वात कमी म्हणजे १५ हजार ३४0 मतांचेच मताधिक्य मिळाले. एकूणच सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाले. इतर उमेदवार मात्र चमत्कार दाखवू शकले नाही.(जिल्हा प्रतिनिधी)