शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

महावितरण उठले शेतकºयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:23 IST

कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार कृषी पंपाची जोडणी कापणार : रब्बी हंगामावर धोक्याचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हितेशी असलेल्याचा दिखाचा करणाºया उर्जा विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकºयांच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे.कृषी पंपाची जोडणी कापण्याच्या या बडग्यातून बचावाकरिता शेतकºयांना सुरू महिन्याचे देयक भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम शेतकºयांना अपेक्षेनुरूप झाला नाही. शिवाय उत्पादनाला मिळणारे दर शेतकºयांना न परवडणारे आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना कुठल्याही रकमेचा भरणा करणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषीपंप धारक शेतकºयांची चिंता वाढली आहे.खरीप हंगामात उत्पन्न झाले नसल्याने ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांकडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनची कापणी केल्यानंतर रबी हंगामाकरिता शेत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रबीची पेरणी करण्यापूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याची पद्धत आहे. या सिंचनाच्या कामाची तयारी शेतकºयांनी केली आहे. यात विहिरीत उपलब्ध असलेले पाणी आणि नदी काठावर अथवा शेततळे असलेल्या शेतकºयांनी तेथून मोटारपंप लावून शेतात पाणी आणण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला गती येत असतानाच महावितरणकडून थकबाकीदार कृषीपंप धारकांच्या जोडण्या कापण्याचे फरमान सोडले आहे. यामुळे रबीची तयारी करणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. याचा विचार शासनाने करणे गरजेचे झाले आहे.६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचा पेरा संकटातवर्धा जिल्ह्यात यंदा पाऊस प्रमाणाच्या तुलनेत कमी झाला. यामुळे ओलिताचे क्षेत्र कमी होईल असे वाटत होते. तो अंदाज खरा ठरत आहे. वर्धेत यंदा ६६ हजार २७५ हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात ८० हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत वर्षी चन्याला बºयापैकी भाव मिळाला होता. यामुळे यंदा चन्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गहू आणि इतर रबी पिके आहेतच.वर्धेतील ६८,२०१ शेतकºयांकडे ८६.१२ कोटीवर्धा जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी ८६ कोटी १२ लाख रुपयांवर असल्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. असलेली थकबाकी आणि विजेची वाढती मागणी यात सांगड घालण्याकरिता महावितरणच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ हजार कृषी पंप धारकांनी जेव्हापासून जोडणी घेतली त्या काळापासून देयकाचा भरणा केला नाही तर ४८ हजार ग्राहकांनी ज्या गत वर्षभरापासून देयक भरले नाही. एका वर्धा जिल्ह्यात एवढी थबकाकी असताना वीज पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यातून बचावाकरिता सुरू वर्षाचे देयक भरणे गरजेचे झाले आहे.