शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महावितरण उठले शेतकºयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:23 IST

कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार कृषी पंपाची जोडणी कापणार : रब्बी हंगामावर धोक्याचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हितेशी असलेल्याचा दिखाचा करणाºया उर्जा विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकºयांच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे.कृषी पंपाची जोडणी कापण्याच्या या बडग्यातून बचावाकरिता शेतकºयांना सुरू महिन्याचे देयक भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम शेतकºयांना अपेक्षेनुरूप झाला नाही. शिवाय उत्पादनाला मिळणारे दर शेतकºयांना न परवडणारे आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना कुठल्याही रकमेचा भरणा करणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषीपंप धारक शेतकºयांची चिंता वाढली आहे.खरीप हंगामात उत्पन्न झाले नसल्याने ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांकडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनची कापणी केल्यानंतर रबी हंगामाकरिता शेत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रबीची पेरणी करण्यापूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याची पद्धत आहे. या सिंचनाच्या कामाची तयारी शेतकºयांनी केली आहे. यात विहिरीत उपलब्ध असलेले पाणी आणि नदी काठावर अथवा शेततळे असलेल्या शेतकºयांनी तेथून मोटारपंप लावून शेतात पाणी आणण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला गती येत असतानाच महावितरणकडून थकबाकीदार कृषीपंप धारकांच्या जोडण्या कापण्याचे फरमान सोडले आहे. यामुळे रबीची तयारी करणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. याचा विचार शासनाने करणे गरजेचे झाले आहे.६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचा पेरा संकटातवर्धा जिल्ह्यात यंदा पाऊस प्रमाणाच्या तुलनेत कमी झाला. यामुळे ओलिताचे क्षेत्र कमी होईल असे वाटत होते. तो अंदाज खरा ठरत आहे. वर्धेत यंदा ६६ हजार २७५ हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात ८० हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत वर्षी चन्याला बºयापैकी भाव मिळाला होता. यामुळे यंदा चन्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गहू आणि इतर रबी पिके आहेतच.वर्धेतील ६८,२०१ शेतकºयांकडे ८६.१२ कोटीवर्धा जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी ८६ कोटी १२ लाख रुपयांवर असल्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. असलेली थकबाकी आणि विजेची वाढती मागणी यात सांगड घालण्याकरिता महावितरणच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ हजार कृषी पंप धारकांनी जेव्हापासून जोडणी घेतली त्या काळापासून देयकाचा भरणा केला नाही तर ४८ हजार ग्राहकांनी ज्या गत वर्षभरापासून देयक भरले नाही. एका वर्धा जिल्ह्यात एवढी थबकाकी असताना वीज पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यातून बचावाकरिता सुरू वर्षाचे देयक भरणे गरजेचे झाले आहे.