शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

महावितरण उठले शेतकºयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:23 IST

कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार कृषी पंपाची जोडणी कापणार : रब्बी हंगामावर धोक्याचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हितेशी असलेल्याचा दिखाचा करणाºया उर्जा विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकºयांच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे.कृषी पंपाची जोडणी कापण्याच्या या बडग्यातून बचावाकरिता शेतकºयांना सुरू महिन्याचे देयक भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम शेतकºयांना अपेक्षेनुरूप झाला नाही. शिवाय उत्पादनाला मिळणारे दर शेतकºयांना न परवडणारे आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना कुठल्याही रकमेचा भरणा करणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषीपंप धारक शेतकºयांची चिंता वाढली आहे.खरीप हंगामात उत्पन्न झाले नसल्याने ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांकडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनची कापणी केल्यानंतर रबी हंगामाकरिता शेत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रबीची पेरणी करण्यापूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याची पद्धत आहे. या सिंचनाच्या कामाची तयारी शेतकºयांनी केली आहे. यात विहिरीत उपलब्ध असलेले पाणी आणि नदी काठावर अथवा शेततळे असलेल्या शेतकºयांनी तेथून मोटारपंप लावून शेतात पाणी आणण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला गती येत असतानाच महावितरणकडून थकबाकीदार कृषीपंप धारकांच्या जोडण्या कापण्याचे फरमान सोडले आहे. यामुळे रबीची तयारी करणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. याचा विचार शासनाने करणे गरजेचे झाले आहे.६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचा पेरा संकटातवर्धा जिल्ह्यात यंदा पाऊस प्रमाणाच्या तुलनेत कमी झाला. यामुळे ओलिताचे क्षेत्र कमी होईल असे वाटत होते. तो अंदाज खरा ठरत आहे. वर्धेत यंदा ६६ हजार २७५ हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात ८० हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत वर्षी चन्याला बºयापैकी भाव मिळाला होता. यामुळे यंदा चन्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गहू आणि इतर रबी पिके आहेतच.वर्धेतील ६८,२०१ शेतकºयांकडे ८६.१२ कोटीवर्धा जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी ८६ कोटी १२ लाख रुपयांवर असल्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. असलेली थकबाकी आणि विजेची वाढती मागणी यात सांगड घालण्याकरिता महावितरणच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ हजार कृषी पंप धारकांनी जेव्हापासून जोडणी घेतली त्या काळापासून देयकाचा भरणा केला नाही तर ४८ हजार ग्राहकांनी ज्या गत वर्षभरापासून देयक भरले नाही. एका वर्धा जिल्ह्यात एवढी थबकाकी असताना वीज पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यातून बचावाकरिता सुरू वर्षाचे देयक भरणे गरजेचे झाले आहे.