शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीवदान देणारी हेल्मेट मोहिम वर्ध्यात थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:45 IST

सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच ही विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते.

ठळक मुद्देयोजना राबविण्यात अडथळा ठरताहेत एसपींच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार वर्ध्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले. मात्र त्यांची तसेच वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच ही विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली नियुक्त झाल्यानंतरही ही मोहिम थंडावलेलीच राहिली. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात तरुण-तरुणींसह नागरिकांमध्ये हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली होती. नवीन पोलीस अधीक्षकांकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी वर्धेला येण्यापूर्वी देण्यात आलेल्या हेल्मेटविषयक सूचनांमुळे सदर मोहीम बारगळल्याची चर्चा होत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक चांदे यांच्या अवघ्या काहीच महिन्यांच्या कार्यकाळात वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येत असल्याने पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज असून तशी मागणीही आहे.नो-पार्किंगच्या नावाखाली वाहनांची उचलवर्धा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक पोलीसांकडून कुठलीही सहानुभूती न दाखविता नो-पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याचे कारण पुढे करून थेट वाहने उचलून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेत नेली जात आहेत. शिवाय वाहनचालकांकडून कारवाईचा धाक दाखवून दंड वसूल केला जात आहे. ज्या परिसरात रस्त्याच्या सिमेंटीकरणाची काम सुरू आहे त्याच भागातून नो-पार्कींगचे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक दुचाकी वाहने ताब्यात घेतली जात आहेत, हे विशेष.१५ चालानचे टार्गेट?वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने शहरातील विविध भागात दररोज वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. कर्तव्यावर असलेले कर्मचारी आपले काम व्यवस्थित आणि प्रामाणिकतेने करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, सध्या एका पॉर्इंटवरील कर्मचाºयांना दिवसभºयात कमीत कमी १५ चालान नागरिकांना देण्याच्या सूचनाच दिल्या असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.अधिकारी बदले असले तरी ही मोहीम ठप्प पडली असे म्हणता येणार नाही. हेल्मेटचा वापर हा नागरिकांसाठी फायद्याचा असून लवकरच पुन्हा नव्या जोमाने हेल्मेट वापर व जनजागृतीची मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे.- निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर गरजेचा आहे. देवी-देवतांचे मुकुट त्यांच्या मानाचा तुरा असून प्रत्येकांचे मुकुट वेगळे नाही. ते अप्रत्यक्ष मानवी समाजाला सुरक्षेचा संदेश देतात.- प्रदीपचंद्र कुळकर्णी, समुद्रपूर.मागील काही महिन्यांपासून हेल्मेट विषयीची मोहीम बारगळली आहे. ती नव्या जोमाने राबविणे आवश्यक आहेच.- विकास दांडगे, शहर प्रमुख, प्रहार, वर्धा.वर्धा शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्ते तयार होत असून अनेक ठिकाणी सिमेंटचेच रस्ते आहेत. काही रस्ता अपघातात हेल्मेटमुळे प्राण वाचले आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातही हेल्मेटचा वापर गरजेचा आहे.- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परितर्वन की आवाज, वर्धा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा