शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी २४ तासात परवाना द्या

By admin | Updated: December 3, 2015 02:29 IST

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही.

मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश : अहवाल पाठविण्याच्याही दिल्या सूचनावर्धा : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही. यामुळे थेट मुख्य वन संरक्षकांनीच शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत परवाने देण्याचे निर्देश दिलेत. शिवाय तक्रार करताच पोच पावती घ्यावी, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्यात.रानडुक्कर वा रोही या वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी संबंधित वनक्षेत्रपाल यांच्या अर्ज देत पोचपावती प्राप्त करावी. उपरोक्त तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल यांनी शहानिशा करून रानडुक्कर वा रोही पारध करण्याबाबत परवाना २४ तासांच्या आत निर्गमित करावा. २४ तासाच्या आत परवाना दिला नाही वा नाकारला नाही तर अर्जदाराला परवाना देण्यात आला आहे, असे गृहित धरून पारध करण्याची मुभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पारध करण्याच्या परवानगीत लागणारा व्यवहारिक कालावधी व क्षेत्राबाबतचा तपशिल नमूद करावा. परवानाधारकाने त्याचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक महिन्यात दिलेले परवाने व त्यानुसार पारध केलेल्या रानडुक्कर, रोही यांची संख्या, विल्हेवाटीचा मासिक अहवाल वनक्षेत्रपालांनी संबंधित उपवन संरक्षकाकडे सादर करावा. उपवन संरक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर पारध झालेल्या वन्य प्राण्यांबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना अहवाल सादर करावा. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेत गरजेनुसार शासनास अहवाल पाठवावा. अडचणी आल्यास प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या.नुकसान पीडित शेतकऱ्यांकडे शस्त्र परवाना नसल्याने रोही व रानडुक्करांची पारध शक्य होत नाही. यासाठी नागपूर जिल्हा रायफल असो.चे नेमबाज चंद्रकांत देशमुख, आरिफ ईकबाल व सहकारी यांची मदत घेता येणार असल्याचेही मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांनी स्पष्ट केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)राष्ट्रीय उद्याने, उभायारण्य, व्याघ्र प्रकल्प, संवर्धन राखीव क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत पारध करण्याची परवानगी देता येत नाही. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेपासून पाच किमी सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना अत्याधिक काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.