शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
3
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
4
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
5
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
6
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
7
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
8
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
10
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
11
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
12
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
13
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
14
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
15
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
16
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
17
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
19
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
20
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी २४ तासात परवाना द्या

By admin | Updated: December 3, 2015 02:29 IST

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही.

मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश : अहवाल पाठविण्याच्याही दिल्या सूचनावर्धा : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही. यामुळे थेट मुख्य वन संरक्षकांनीच शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत परवाने देण्याचे निर्देश दिलेत. शिवाय तक्रार करताच पोच पावती घ्यावी, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्यात.रानडुक्कर वा रोही या वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी संबंधित वनक्षेत्रपाल यांच्या अर्ज देत पोचपावती प्राप्त करावी. उपरोक्त तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल यांनी शहानिशा करून रानडुक्कर वा रोही पारध करण्याबाबत परवाना २४ तासांच्या आत निर्गमित करावा. २४ तासाच्या आत परवाना दिला नाही वा नाकारला नाही तर अर्जदाराला परवाना देण्यात आला आहे, असे गृहित धरून पारध करण्याची मुभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पारध करण्याच्या परवानगीत लागणारा व्यवहारिक कालावधी व क्षेत्राबाबतचा तपशिल नमूद करावा. परवानाधारकाने त्याचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक महिन्यात दिलेले परवाने व त्यानुसार पारध केलेल्या रानडुक्कर, रोही यांची संख्या, विल्हेवाटीचा मासिक अहवाल वनक्षेत्रपालांनी संबंधित उपवन संरक्षकाकडे सादर करावा. उपवन संरक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर पारध झालेल्या वन्य प्राण्यांबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना अहवाल सादर करावा. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेत गरजेनुसार शासनास अहवाल पाठवावा. अडचणी आल्यास प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या.नुकसान पीडित शेतकऱ्यांकडे शस्त्र परवाना नसल्याने रोही व रानडुक्करांची पारध शक्य होत नाही. यासाठी नागपूर जिल्हा रायफल असो.चे नेमबाज चंद्रकांत देशमुख, आरिफ ईकबाल व सहकारी यांची मदत घेता येणार असल्याचेही मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांनी स्पष्ट केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)राष्ट्रीय उद्याने, उभायारण्य, व्याघ्र प्रकल्प, संवर्धन राखीव क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत पारध करण्याची परवानगी देता येत नाही. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेपासून पाच किमी सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना अत्याधिक काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.