शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला परवाना, पण ठेवी अडचणीतच

By admin | Updated: May 7, 2016 02:10 IST

अर्थिक डबघाईस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रद्द झालेला बँकींग परवाना परत मिळाला आहे.

किसान अधिकार अभियानची माहिती : बँकेने वसुलीकडे लक्ष देण्याची मागणी वर्धा : अर्थिक डबघाईस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रद्द झालेला बँकींग परवाना परत मिळाला आहे. यामुळे येथे अडलेल्या ठेवी परत मिळण्याचे संकेत मिळत असले तरी वसुलीअभावी त्या अजूनही अडचणीतच आहेत. यामुळे बँकेने मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करावी अशी मागणी बँकेच्या ठेवीदार संघटनांनी केली आहे. या संदर्भात किसान अधिकार अभियानने शुक्रवारी पत्रकार परिषदेतून माहिती दिली. शिवाय या मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. बँकेच्या थकबाकीदारात सर्वात मोठे थकबाकीदार म्हणून संचालक मंडळात असलेल्या देशमुख परिवाराकडे पद असलेल्या संस्था आहेत. त्यांनी या संस्थांकडे असलेली थकबाकी वेळेत बँकेत भरल्यास मोठे भांडवल निर्माण होणे शक्य आहे. याच संस्थांकडे सुमारे ८७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप यावेळी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी केला. त्यांनी या रकमेचा भरणा केल्यास येथील ठेविदारांच्या ठेवी मिळण्याची आशा आहे. बँकेची थकबाकी ३५० कोटी रुपयांची आहे. यातील १०० कोटी तर मोठ्या ठेवीदारांकडे थकले आहे. या वसुलीकडे लक्ष देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात बँक व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्यास या थकबाकीदारांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची कारवाई करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. बँक व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्यास किसान अधिकार अभियान या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे किसान अधिकार अभियानच्यावतीने सांगण्यात आले आहे. ठेवीदारांकरिता विशेष पॅकेजची मागणीही यावेळी करण्यात आली. जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.(प्रतिनिधी) २४० कोटींचे पीककर्ज थकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना २४० कोटी रुपयांच पीककर्ज वितरित केले. त्यापैकी गावस्तरावर विविध कार्यकारी संस्थेच्या गटसचिवांनी वसुली केली. यातून सुमारे १२५ कोटी रुपयांची वसुली झाली; मात्र ती बँकेत जमा करण्यात आली नाही. ती रक्कम इतर खर्चात दाखविण्यात आली आहे. यामुळे ती रक्कम बँकेच्या कर्जात येणार नसून ती रक्कम बुडल्यातच जमा असल्याचा आरोप आहे. संपूर्ण कर्जमाफी एकमेव पर्याय सध्या सर्वत्र शेतकऱ्यांकरिता संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. यात जिल्हा बँकेला जर २४० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली तर मोठी रक्कम मिळेल. या रकमेतून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणे सोईचे होईल, असे ठेवीदार संघटनेचे म्हणणे आहे.