शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

उधारी द्यावी की, रब्बीची पेरणी करावी

By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST

शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना चिंता : अधिवेशनाकडे लक्षवायगाव (नि.) : शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यातच रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणी करावी की उधारी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्रासह राज्यात सत्तापरिवर्तन झाले असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असल्याचे दुदैैवी चित्र आहे. शेतीवर संपूर्ण जिवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा अवकृपा होत आहे. यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे चांगला पगार असलेले संघटीत सरकारी कर्मचारी पगार वाढीसाठी आंदोलने करत असतात. मात्र जगाचा पोशिंदा आपला घाम गाळून पिकविलेल्या मालाला वाजवी भाव मिळावा याकरिता सरकारकडे आशेने बघत आहे. शासनाकडून काही मदत मिळाली तर त्याचा आधार होईल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. खरीपाच्या हंगामात या वर्षी शेतकऱ्यांना नापिकीच्या सामना करावा लागला. यात सोयाबीन पूर्णत: गेले. कपाशीची आशा होती मात्र पाण्याअभावी वाढ खुंटली व पऱ्हाटीवर लाल्याने थैमान घातले. त्यातच कापसाला अत्यल्प भाव मिळत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल झालेल्या शेतकरी रब्बीच्या पिकाकडे आशा लावून आहे. खरीपाच्या तोंडावर घेतलेली उधारीची चिंता मुलांचे शिक्षण, आजार, घरखर्च व आता रब्बीची सुरू झालेली पेरणी यामुळे चिंतेत अधिकच भर पडली. आहे. कापसाला गत वर्षापेक्षाही राज्यशासनाने कमी हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांची पूर्णत: निराशाच झाली आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असल्याने भावात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु रबी हंगाम सुरू झाला असतानाही हाती पैसा नसल्याने उधारी द्यावी की रबीची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.(वार्ताहर)