शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

उधारी द्यावी की, रब्बीची पेरणी करावी

By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST

शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना चिंता : अधिवेशनाकडे लक्षवायगाव (नि.) : शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यातच रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणी करावी की उधारी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्रासह राज्यात सत्तापरिवर्तन झाले असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असल्याचे दुदैैवी चित्र आहे. शेतीवर संपूर्ण जिवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा अवकृपा होत आहे. यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे चांगला पगार असलेले संघटीत सरकारी कर्मचारी पगार वाढीसाठी आंदोलने करत असतात. मात्र जगाचा पोशिंदा आपला घाम गाळून पिकविलेल्या मालाला वाजवी भाव मिळावा याकरिता सरकारकडे आशेने बघत आहे. शासनाकडून काही मदत मिळाली तर त्याचा आधार होईल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. खरीपाच्या हंगामात या वर्षी शेतकऱ्यांना नापिकीच्या सामना करावा लागला. यात सोयाबीन पूर्णत: गेले. कपाशीची आशा होती मात्र पाण्याअभावी वाढ खुंटली व पऱ्हाटीवर लाल्याने थैमान घातले. त्यातच कापसाला अत्यल्प भाव मिळत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल झालेल्या शेतकरी रब्बीच्या पिकाकडे आशा लावून आहे. खरीपाच्या तोंडावर घेतलेली उधारीची चिंता मुलांचे शिक्षण, आजार, घरखर्च व आता रब्बीची सुरू झालेली पेरणी यामुळे चिंतेत अधिकच भर पडली. आहे. कापसाला गत वर्षापेक्षाही राज्यशासनाने कमी हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांची पूर्णत: निराशाच झाली आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असल्याने भावात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु रबी हंगाम सुरू झाला असतानाही हाती पैसा नसल्याने उधारी द्यावी की रबीची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.(वार्ताहर)