शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी कर्मचाऱ्यांना जलसंधारणाचे धडे

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग,

वर्धा : सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, वनविभाग व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी माहिती देण्यात आली. शिवाय त्यांना करावयाचे कार्यही सांगण्यात आले. वर्धा जिल्हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा असून यात ओलिताचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिले प्रत्येकच विभागाच्यावतीने पाणी अडवून ते जिरविण्यात येत होते. आता मात्र तसे होणार नाही. जिल्ह्यात बंधारे तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी मिळवून बंधारा तयार करण्यात येणार आहे. या बाबत आजची कार्यशाळा आयोजित होती. या शाळेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मवारी उपस्थित होते. विकास भवन येथे झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना होते. अतिथी म्हणून जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे आर.टी. वाहने, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे सहारे, उपविभागीस अधिकारी वैभव नावाडकर, विलास ठाकरे, उपअभियंता सुनील राहाणे, वरिष्ठ भू वैज्ञानिक नितीन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)