शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सोयाबीनचा उतारा खर्चापेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:33 IST

दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम : एकरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते. अपुºया पावसामुळे सोयाबीनचा उतारा निम्म्यावर आला आहे. यातच मजुरीचे भावही वाढले आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.विजयगोपाल परिसरात यंदा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे सोयाबीनची लागवड करण्यात आली; पण त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी, सोयाबीनच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम झाला. अनेक शेतकºयांनी ओलित करून सोयाबीन जगविण्याचा प्रयत्न केला. तुषार सिंचनासारख्या पावसावर सोयाबीन वाढविले; पण ऐन फुल धारणेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. सुमारे ४० दिवस पाऊस न आल्याने पिकाचा फुलोरा गळून गेला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. या सर्वांचा परिणाम आता उत्पन्नावर दिसून येत आहे. मागील वर्षी ज्या शेतात नऊ ते दहा क्विंटल एकरी उतारा येत होता, तेथे यावर्षी केवळ पाच ते सहा क्विंटल उतारा येत असल्याचे दिसून येत आहे.दुष्काळामुळे मजुरांनी शहरात स्थानांतरण केले आहे. याचा फायदा घेत गावांतील मोजके मजूर भाव वाढवून घेत आहेत. मागील वर्षी सवंगणीचे दर १४०० ते १५०० रुपये होते. यावर्षी ते १८०० ते २००० रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात सोयाबीन काढण्याच्या कामाला वेग आला आहे; पण मजुरीचे वाढलेले दर आणि निम्मा झालेला उतारा यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय अत्यल्प पावसामुळे रबी हंगामात गहू, हरभरा घेणे कठीण झाले आहे. परिणामी, सोयाबीनची पेरणी करून बहुतांश शेतकरी पश्चाताप करीत असल्याचेच दिसून येत आहे.बाजारभाव स्थिरनिसर्ग साथ देत नाही आणि बाजारात भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीनचे हमीभाव ३०५० आहे. एकरी सोयाबीनला १५ ते १६ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. सरासरी ५ क्विंटल उत्पादन निघाल्यास जेमतेम उत्पादन आणि खर्च बरोबरीत होतो. यात शेतकºयांच्या हाती काहीच उरणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.