शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

सोयाबीनचा उतारा खर्चापेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:33 IST

दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम : एकरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते. अपुºया पावसामुळे सोयाबीनचा उतारा निम्म्यावर आला आहे. यातच मजुरीचे भावही वाढले आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.विजयगोपाल परिसरात यंदा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे सोयाबीनची लागवड करण्यात आली; पण त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी, सोयाबीनच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम झाला. अनेक शेतकºयांनी ओलित करून सोयाबीन जगविण्याचा प्रयत्न केला. तुषार सिंचनासारख्या पावसावर सोयाबीन वाढविले; पण ऐन फुल धारणेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. सुमारे ४० दिवस पाऊस न आल्याने पिकाचा फुलोरा गळून गेला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. या सर्वांचा परिणाम आता उत्पन्नावर दिसून येत आहे. मागील वर्षी ज्या शेतात नऊ ते दहा क्विंटल एकरी उतारा येत होता, तेथे यावर्षी केवळ पाच ते सहा क्विंटल उतारा येत असल्याचे दिसून येत आहे.दुष्काळामुळे मजुरांनी शहरात स्थानांतरण केले आहे. याचा फायदा घेत गावांतील मोजके मजूर भाव वाढवून घेत आहेत. मागील वर्षी सवंगणीचे दर १४०० ते १५०० रुपये होते. यावर्षी ते १८०० ते २००० रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात सोयाबीन काढण्याच्या कामाला वेग आला आहे; पण मजुरीचे वाढलेले दर आणि निम्मा झालेला उतारा यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय अत्यल्प पावसामुळे रबी हंगामात गहू, हरभरा घेणे कठीण झाले आहे. परिणामी, सोयाबीनची पेरणी करून बहुतांश शेतकरी पश्चाताप करीत असल्याचेच दिसून येत आहे.बाजारभाव स्थिरनिसर्ग साथ देत नाही आणि बाजारात भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीनचे हमीभाव ३०५० आहे. एकरी सोयाबीनला १५ ते १६ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. सरासरी ५ क्विंटल उत्पादन निघाल्यास जेमतेम उत्पादन आणि खर्च बरोबरीत होतो. यात शेतकºयांच्या हाती काहीच उरणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.