शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट!
2
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
3
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
4
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
5
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
6
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
7
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
8
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
9
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
10
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
11
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
12
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
14
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
15
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
16
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
17
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
18
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
19
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
20
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video

सोयाबीनचा उतारा खर्चापेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:33 IST

दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम : एकरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते. अपुºया पावसामुळे सोयाबीनचा उतारा निम्म्यावर आला आहे. यातच मजुरीचे भावही वाढले आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.विजयगोपाल परिसरात यंदा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे सोयाबीनची लागवड करण्यात आली; पण त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी, सोयाबीनच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम झाला. अनेक शेतकºयांनी ओलित करून सोयाबीन जगविण्याचा प्रयत्न केला. तुषार सिंचनासारख्या पावसावर सोयाबीन वाढविले; पण ऐन फुल धारणेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. सुमारे ४० दिवस पाऊस न आल्याने पिकाचा फुलोरा गळून गेला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. या सर्वांचा परिणाम आता उत्पन्नावर दिसून येत आहे. मागील वर्षी ज्या शेतात नऊ ते दहा क्विंटल एकरी उतारा येत होता, तेथे यावर्षी केवळ पाच ते सहा क्विंटल उतारा येत असल्याचे दिसून येत आहे.दुष्काळामुळे मजुरांनी शहरात स्थानांतरण केले आहे. याचा फायदा घेत गावांतील मोजके मजूर भाव वाढवून घेत आहेत. मागील वर्षी सवंगणीचे दर १४०० ते १५०० रुपये होते. यावर्षी ते १८०० ते २००० रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात सोयाबीन काढण्याच्या कामाला वेग आला आहे; पण मजुरीचे वाढलेले दर आणि निम्मा झालेला उतारा यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय अत्यल्प पावसामुळे रबी हंगामात गहू, हरभरा घेणे कठीण झाले आहे. परिणामी, सोयाबीनची पेरणी करून बहुतांश शेतकरी पश्चाताप करीत असल्याचेच दिसून येत आहे.बाजारभाव स्थिरनिसर्ग साथ देत नाही आणि बाजारात भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीनचे हमीभाव ३०५० आहे. एकरी सोयाबीनला १५ ते १६ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. सरासरी ५ क्विंटल उत्पादन निघाल्यास जेमतेम उत्पादन आणि खर्च बरोबरीत होतो. यात शेतकºयांच्या हाती काहीच उरणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.