शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कर्जमाफी मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:04 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : विविध योजनांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.पीक कर्ज वाटप, कर्जमाफी, पीएम किसान आदी योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. सर्व बँकांनी त्यांच्या शाखानिहाय पीक कर्ज वाटपाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी. तसेच एखाद्या शेतकऱ्यांचा पीक कर्ज नाकारण्याचे कारण द्यावे. रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करताना अडचणी येत असतील तर त्याची माहिती तात्काळ शासनाला कळविण्यात यावी. शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हे अभियान राबविण्यात येत आहे. शेतकºयांना बँकेमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे आणि अभियानाच्या योग्य अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या १३९ शाखांसाठी प्रत्येक शाखानिहाय संपर्क अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक बँक मॅनेजर आणि संपर्क अधिकारी यांची आठवड्यातून एकदा बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सागितले. आजपर्यंत केवळ ६.८ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बँकांनी शाखानिहाय मेळावे घेण्याचे निर्देश दिलेत. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, लीड बँक मॅनेजर बिरेंद्रकुमार, जिल्हा उपनिबंधक वालदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज