शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रिधोरा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडा

By admin | Updated: December 22, 2014 22:52 IST

शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ

झडशी : शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर पंचधारा धरण बांधण्यात आले. परंतु परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांना आजही सिंचनाची प्रतीक्षा आहे. झडशी भागातील शेतकऱ्यांना ओलिताकरिता बारा महिने पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता शासनाच्या वतीने १९८५-८६ दरम्यान झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर धरण बांधण्यात आले. इतकेच नव्हे तर जवळच असलेल्या बोरखेडी (कला) येथेही जंगलाच्या मध्यभागी दुसरे धरण उभारण्यात आले. दोन धरणे असतानाही झडशी परिसरातील केवळ निम्मा भागच सिंचनाखाली येतो. उर्वरित संपूर्ण पाणी वडगाव, सुरगाव, रेहकी, या गावातीलच शेतकऱ्याच्या ओलिता करिता जातो. त्यामुळे या परिसरात धरण असतानाही येथील शेतक ऱ्यांना योग्य प्रमाणात सिंचनाचा फायदा होत नसल्याची ओरड परिसरातील शेतकरी करीत आहे. या कालाव्याद्वारे रब्बी हंगामाकरिता सोडलेले पाणी कालवे ओव्हरफ्लो होऊन सरळ वेस्टेजच्या नालीद्वारे खैरी परिसरातील नाल्यावर निघून जाते. त्या नाल्याचे पाणी देखील रेहकी, सुरगाव, पवनार भागाकडे जात असल्याने येथील शेतकऱ्यांना फायदाच होतो. दरवर्षी पंचधारा नदीला भरपूर पाणी असते. यंदा मात्र ही पारिस्थिती नाही. त्यामुळे यंदा या परिसरातील विहिरींची पातळीही कमालीची खालावली आहे. झडशी परिसरातील काही शेतकऱ्यांनी उपकार्यालय सेलू येथील पाटबंधारे विभागाशी संपर्क करून शासकीय नियमाप्रमाणे पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी शासनाच्या नियमाने लागणारा कर आकारून जवळपास सत्तर-ऐंशी हजार रूपये भरावे लागतात असे अभियंत्यांद्वारे सांगितले जाते. सोबतच जिल्हाधिकारी यांची परवानगीआही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कालव्यातून सतत पाण्याचा अपव्यय होतो, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून तलाव तयार होतात त्याचेर काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहे. तसेच कालव्याद्वारे होणाऱ्या वेस्टेजच्या सहाय्याने नाल्यावर जाणाऱ्या पाण्याकरिता जिल्हाधिकाऱ्याची परवानगी नसावी का? त्याला कर का लागत नाही असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहे. धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी सतत करीत आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याचा प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देत पाणी सोडण्यास सांगावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहेत.(वार्ताहर)