शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रिधोरा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडा

By admin | Updated: December 22, 2014 22:52 IST

शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ

झडशी : शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर पंचधारा धरण बांधण्यात आले. परंतु परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांना आजही सिंचनाची प्रतीक्षा आहे. झडशी भागातील शेतकऱ्यांना ओलिताकरिता बारा महिने पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता शासनाच्या वतीने १९८५-८६ दरम्यान झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर धरण बांधण्यात आले. इतकेच नव्हे तर जवळच असलेल्या बोरखेडी (कला) येथेही जंगलाच्या मध्यभागी दुसरे धरण उभारण्यात आले. दोन धरणे असतानाही झडशी परिसरातील केवळ निम्मा भागच सिंचनाखाली येतो. उर्वरित संपूर्ण पाणी वडगाव, सुरगाव, रेहकी, या गावातीलच शेतकऱ्याच्या ओलिता करिता जातो. त्यामुळे या परिसरात धरण असतानाही येथील शेतक ऱ्यांना योग्य प्रमाणात सिंचनाचा फायदा होत नसल्याची ओरड परिसरातील शेतकरी करीत आहे. या कालाव्याद्वारे रब्बी हंगामाकरिता सोडलेले पाणी कालवे ओव्हरफ्लो होऊन सरळ वेस्टेजच्या नालीद्वारे खैरी परिसरातील नाल्यावर निघून जाते. त्या नाल्याचे पाणी देखील रेहकी, सुरगाव, पवनार भागाकडे जात असल्याने येथील शेतकऱ्यांना फायदाच होतो. दरवर्षी पंचधारा नदीला भरपूर पाणी असते. यंदा मात्र ही पारिस्थिती नाही. त्यामुळे यंदा या परिसरातील विहिरींची पातळीही कमालीची खालावली आहे. झडशी परिसरातील काही शेतकऱ्यांनी उपकार्यालय सेलू येथील पाटबंधारे विभागाशी संपर्क करून शासकीय नियमाप्रमाणे पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी शासनाच्या नियमाने लागणारा कर आकारून जवळपास सत्तर-ऐंशी हजार रूपये भरावे लागतात असे अभियंत्यांद्वारे सांगितले जाते. सोबतच जिल्हाधिकारी यांची परवानगीआही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कालव्यातून सतत पाण्याचा अपव्यय होतो, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून तलाव तयार होतात त्याचेर काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहे. तसेच कालव्याद्वारे होणाऱ्या वेस्टेजच्या सहाय्याने नाल्यावर जाणाऱ्या पाण्याकरिता जिल्हाधिकाऱ्याची परवानगी नसावी का? त्याला कर का लागत नाही असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहे. धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी सतत करीत आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याचा प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देत पाणी सोडण्यास सांगावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहेत.(वार्ताहर)