शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

रिधोरा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडा

By admin | Updated: December 22, 2014 22:52 IST

शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ

झडशी : शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर पंचधारा धरण बांधण्यात आले. परंतु परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांना आजही सिंचनाची प्रतीक्षा आहे. झडशी भागातील शेतकऱ्यांना ओलिताकरिता बारा महिने पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता शासनाच्या वतीने १९८५-८६ दरम्यान झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर धरण बांधण्यात आले. इतकेच नव्हे तर जवळच असलेल्या बोरखेडी (कला) येथेही जंगलाच्या मध्यभागी दुसरे धरण उभारण्यात आले. दोन धरणे असतानाही झडशी परिसरातील केवळ निम्मा भागच सिंचनाखाली येतो. उर्वरित संपूर्ण पाणी वडगाव, सुरगाव, रेहकी, या गावातीलच शेतकऱ्याच्या ओलिता करिता जातो. त्यामुळे या परिसरात धरण असतानाही येथील शेतक ऱ्यांना योग्य प्रमाणात सिंचनाचा फायदा होत नसल्याची ओरड परिसरातील शेतकरी करीत आहे. या कालाव्याद्वारे रब्बी हंगामाकरिता सोडलेले पाणी कालवे ओव्हरफ्लो होऊन सरळ वेस्टेजच्या नालीद्वारे खैरी परिसरातील नाल्यावर निघून जाते. त्या नाल्याचे पाणी देखील रेहकी, सुरगाव, पवनार भागाकडे जात असल्याने येथील शेतकऱ्यांना फायदाच होतो. दरवर्षी पंचधारा नदीला भरपूर पाणी असते. यंदा मात्र ही पारिस्थिती नाही. त्यामुळे यंदा या परिसरातील विहिरींची पातळीही कमालीची खालावली आहे. झडशी परिसरातील काही शेतकऱ्यांनी उपकार्यालय सेलू येथील पाटबंधारे विभागाशी संपर्क करून शासकीय नियमाप्रमाणे पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी शासनाच्या नियमाने लागणारा कर आकारून जवळपास सत्तर-ऐंशी हजार रूपये भरावे लागतात असे अभियंत्यांद्वारे सांगितले जाते. सोबतच जिल्हाधिकारी यांची परवानगीआही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कालव्यातून सतत पाण्याचा अपव्यय होतो, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून तलाव तयार होतात त्याचेर काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहे. तसेच कालव्याद्वारे होणाऱ्या वेस्टेजच्या सहाय्याने नाल्यावर जाणाऱ्या पाण्याकरिता जिल्हाधिकाऱ्याची परवानगी नसावी का? त्याला कर का लागत नाही असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहे. धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी सतत करीत आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याचा प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देत पाणी सोडण्यास सांगावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहेत.(वार्ताहर)