शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विधी सेवा सामान्य नागरिकांचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:39 IST

विधी सेवा हा सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. तो त्यांना मिळवून देण्याकरिता विधी सेवा प्राधिकरण सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वि.आ. पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवि.आ. पाटील : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतवर्धा : विधी सेवा हा सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. तो त्यांना मिळवून देण्याकरिता विधी सेवा प्राधिकरण सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वि.आ. पाटील यांनी व्यक्त केले.नागरिकांना कायदेविषयक आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी यशवंत महाविद्यालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे सामान्य किमान कार्यक्रम २०१८ अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटील पूढे म्हणाले की, बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी असलेल्या नुकसान भरपाई योजनेची अंमलबजावणी विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून केली जाते. यासाठी नागरिकांकडून प्राप्त अर्ज संबंधित समितीसमोर ठेवण्यात येतात. प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून समिती नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करते, असेही पाटील यांनी सांगितले.नगर परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे तक्रारी करू शकतात. प्राप्त तक्रारींचा पाठपुरावा करून विधी सेवा प्राधिकरण नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये पक्षकार आर्थिक दुरवस्थेमुळे वकीलांचा खर्च करू शकत नाही. अशा पक्षकारांना न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी सरकारी खर्चाने विधी सेवा प्राधिकरण विधी सहाय्य देते. यासाठी पक्षकार संबंधित न्यायालयामध्ये वा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतो. महिलांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करण्याची गरज नाही. तसेच उत्पन्नाची मर्यादाही नाही. अनु. जाती, अनु. जमाती, स्त्रिया, बालके, अपंग व्यक्ती, भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीचे बळी, औद्योगिक कामगार व वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना मोफत विधी सहाय्य व सल्ला दिला जातो. अन्य पक्षकारांना मात्र जातीचा दाखला व उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.यावेळी तहसीलदार महेंद्र सोनवणे, गटविकास अधिकारी एस. एम. कोल्हे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बुंदेले, कृषी विस्तार अधिकारी, रेशीम विकास अधिकारी आदींनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संजय चौधरी यांनी केले तर आभार प्रा. काळे यांनी मानले.