शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

विधी सेवा सामान्य नागरिकांचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:39 IST

विधी सेवा हा सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. तो त्यांना मिळवून देण्याकरिता विधी सेवा प्राधिकरण सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वि.आ. पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवि.आ. पाटील : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतवर्धा : विधी सेवा हा सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. तो त्यांना मिळवून देण्याकरिता विधी सेवा प्राधिकरण सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वि.आ. पाटील यांनी व्यक्त केले.नागरिकांना कायदेविषयक आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी यशवंत महाविद्यालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे सामान्य किमान कार्यक्रम २०१८ अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटील पूढे म्हणाले की, बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी असलेल्या नुकसान भरपाई योजनेची अंमलबजावणी विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून केली जाते. यासाठी नागरिकांकडून प्राप्त अर्ज संबंधित समितीसमोर ठेवण्यात येतात. प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून समिती नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करते, असेही पाटील यांनी सांगितले.नगर परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे तक्रारी करू शकतात. प्राप्त तक्रारींचा पाठपुरावा करून विधी सेवा प्राधिकरण नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये पक्षकार आर्थिक दुरवस्थेमुळे वकीलांचा खर्च करू शकत नाही. अशा पक्षकारांना न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी सरकारी खर्चाने विधी सेवा प्राधिकरण विधी सहाय्य देते. यासाठी पक्षकार संबंधित न्यायालयामध्ये वा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतो. महिलांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करण्याची गरज नाही. तसेच उत्पन्नाची मर्यादाही नाही. अनु. जाती, अनु. जमाती, स्त्रिया, बालके, अपंग व्यक्ती, भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीचे बळी, औद्योगिक कामगार व वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना मोफत विधी सहाय्य व सल्ला दिला जातो. अन्य पक्षकारांना मात्र जातीचा दाखला व उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.यावेळी तहसीलदार महेंद्र सोनवणे, गटविकास अधिकारी एस. एम. कोल्हे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बुंदेले, कृषी विस्तार अधिकारी, रेशीम विकास अधिकारी आदींनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संजय चौधरी यांनी केले तर आभार प्रा. काळे यांनी मानले.