शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बांधकामाच्या नावावर लाटले शौचालयाचे अनुदान

By admin | Updated: September 21, 2016 01:05 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत वर्धा पालिकेत अनुदानावर शौचालय बांधकामाची योजना राबविण्यात येत आहे.

१३७ जणांवर होणार फौजदारी कारवाई : वर्धा पालिकेच्या सर्वेक्षणात उघड रूपेश खैरी वर्धास्वच्छ भारत अभियानांतर्गत वर्धा पालिकेत अनुदानावर शौचालय बांधकामाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत वर्धेतील तब्बल १३७ जणांनी अनुदानाचा पहिला हप्ता उचलून शौचालयाचे बांधकामच केले नसल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. शासनाचे अनुदान लाटणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी पालिकेच्यावतीने सुरू झाली आहे. शहरातील प्रत्येक घरी शौचालय असावे याकरिता १७ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शहरी भागात ही योजना राबविण्याची जबादारी पालिकेकडे होती. वर्धेत या योजनेत नागरिकांनी सहभागी व्हावे, याकरिता नगरसेवकांमार्फत त्यांच्या प्रभागातील गरजवंताचे अर्ज मागविले. या अर्जानुसार लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले. वर्धेत या योजनेकरिता एकूण ९५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना तीन टप्प्यात अनुदान देण्यात येणार होते. यात पहिला सहा हजार रुपयांचा हप्पा शौचालयाकरिता लागणारा खड्डा खोदताच मंजूर करण्यात येणार होता. यानुसार अर्ज केलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती पालिकेला देताच त्यांच्याकडून लाभार्थ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात आला. खड्डा खोदकामानंतर बांधकामाकरिता दुसरा सहा हजार रुपयांचा व तिसरे पाच हजार रुपये काम पूर्ण होताच देण्यात येणार होते.वर्धा पालिकेत शौचालयाकरिता अर्ज आल्यानंतर बऱ्याच नागरिकांनी पहिला हप्पा उचलला. यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने अनुदानाची उचल करणाऱ्या लाभार्थ्यांच्या घराचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत तब्बल १३७ जणांनी अनुदनाची उचल करून कुठलेही बांधकाम केले नसल्याचे समोर आले. त्यांना अनुदान उचलल्याने शौचालयाचे बांधकाम करण्यासंदर्भात पालिकेच्यावतीने सूचना करण्यात आल्या; मात्र त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले. यामुळे पालिकेच्यावतीने आता अशा नागरिकाच्या घराची पाहणी करून फौजदारी कार्यवाही करण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेच्यावतीने करण्यात येणार असलेल्या कारवाईकडे वर्धकरांचे लक्ष लागले आहे. पोलिसांशी चर्चा शासनाच्या योजनेतील अनुदान लाटणाऱ्यांवर फोजदारी कार्यवाही करण्याकरिता पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली आहे. या चर्चेत पोलिसांनी तक्रार नोंदवा आम्ही गुन्हा दाखल करू, अशी भूमिका घेतल्याची माहिती आहे. ही तक्रार करण्यापूर्वी पालिकेच्यावतीने पुन्हा एकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित या घरांचा सर्व्हे करून यादीतील संपूर्ण १३७ जणांवर ही फौजदारी कारवाई करणार असल्याची माहिती आहे. तब्बल ८ लाख २२ हजार रुपयांची उचल शौचालयाकरिता पालिकेत एकूण ९५३ अर्ज आले होते. या अर्जा नुसार पहिला हप्ता देण्यात आला. त्याचा सर्व्हे केला असता १३७ जणांनी शौचालयाचे बांधकाम केले नसल्याचे समोर आले. या १३७ जणांनी ६ हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची उचल करून तब्बल ८ लाख २२ हजार रुपयांची उचल केली आहे. यामुळे ही रक्कम वसूल करण्याकरिता या कारवाईचे प्रयोजन असल्याची चर्चा आहे.या सर्व प्रकाराला पालिकाच जबाबदार शहरी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अनेकांची घरे रस्त्याच्या कडेला आहेत. अशात पालिकेत शौचालयाकरिता अर्ज सादर करणारा व्यक्ती शोचालय कुठे बांधणार याची कुठलीही पाहणी प्रकरणाला मंजुरी देताना पालिकेच्यावतीने करण्यात आली नाही. केवळ आपले उद्दिष्ट वाढविण्याकरिता आलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देताना कुठल्याही तांत्रिक बाबीचा विचार करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांनी अर्ज करताना देण्यात आलेल्या अनुदानाची उचल त्यांनी केली, त्यांच्याकडे शौचालय बांधकामाकरिता जागाच नाही तर ते बांधणार कुठे अशी काही ठिकाणची स्थिती असल्याची माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली