शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

आमगावात शौचालय बांधकामांना प्रारंभ

By admin | Updated: June 28, 2014 23:43 IST

शासनाने गावे हागणदारीमुक्त व्हावीत व स्वच्छता राखून आजारांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी निर्मलग्राम योजना हाती घेतली़ यासाठी प्रत्येक गावात १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले;

वर्धा : शासनाने गावे हागणदारीमुक्त व्हावीत व स्वच्छता राखून आजारांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी निर्मलग्राम योजना हाती घेतली़ यासाठी प्रत्येक गावात १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले; पण अनेक गावांत पुरूषांनी पुढाकार घेतला नाही़ यामुळे सेलू तालुक्यातील आमगाव (खडकी) च्या महिलांनी आपल्या पतींविरूद्धच चुलबंद आंदोलन पुकारले़ तीन दिवस चाललेल्या या आंदोलनाचा धसका घेत अनेकांनी शौचालय बांधकाम सुरू केले़ यामुळे हे आंदोलन आमगावपूरते मर्यादित न ठेवता वर्धा उपविभागात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला़ शिवाय शेतीच्या कामांसाठी तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले़ग्रामीण भागातील नागरिक घरांचे बांधकाम करतात; पण त्यात शौचालय अंतर्भुत करीत नाहीत़ यामुळे महिला, युवतींना उघड्यावर शौचास बसावे लागते़ यात अस्वच्छतेमुळे अनेक आजार जडतात़ शिवाय महिलांचा दागिना असलेली ‘लाज’ही वेशीवर टांगली जाते़ या सर्वांचा तिटकारा आल्याने आमगाव (खडकी) येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे किसान अधिकार अभियानच्या नेतृत्वात जोपर्यंत शौचालय बांधले जात नाही, तोपर्यंत स्वयंपाकच करणार नाही, असा निर्णय घेत चुलबंद आंदोलन सुरू आहे़ तीन दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे पुरूषांवर स्वयंपाक करून अन्य कामे करण्याची वेळ आली आहे़ स्वयंपाक करणे, मुलांना जेवण देणे, आपल्या पत्नी, आईला डबा देणे व त्यानंतर शेतातील कामे करण्याची वेळ आल्याने पुरूष मंडळी मेटाकुटीस आली होती़ या आंदोलनाचा धसका घेत आमगाव येथील अनेक पुरूषांनी शौचालय बांधकामास सुरूवातही केली़ या अभिनव आंदोलनामुळे आमगाव १०० टक्के हागणदारी मुक्त होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे़ग्रामीण भागात अनेकांच्या घरी शौचालये आहेत; पण ग्रामस्थ त्याचा वापर करीत नाही़ निर्मलग्राम योजनेंतर्गत बांधलेल्या शौचालयात अनेकांनी इंधन ठेवल्याचेही प्रकार आढळून येतात़ या प्रकारामुळे उघड्यावर शौचविधी आटोपण्याची मानसिकता जात नसल्याचे दिसते़ आमगाव येथील महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे अधिकाऱ्यांनीही कौतुक करीत या निर्णयांमुळे १०० टक्के शौचालयांचे उद्दीष्ट साध्य होऊ शकेल, असे मत व्यक्त केले आहे़ आंदोलनात निर्मला ठाकरे, फुला पवार, आरती पवार, विद्या मरस्कोल्हे, शीला चव्हाण, लीला जाधव, पूजा पवार, जयश्री पवार, सत्यभामा पवार, इंदू मसराम, शालिनी ठाकरे, रेखा पवार, समाधान पवार, अनिल तेलरांधे, जयराम पवार, गोविंदा पवार, चंद्रभान आत्राम, अक्षय पवार, देवलाल चव्हाण, सुरेश मोहिते, पद्माकर मरस्कोेल्हे यांनी सहभाग घेतला़ किसान अधिकार अभियानने ग्रामीण भागातील पेरण्या व शेतीची कामे लक्षात घेत हे आंदोलन तुर्तास स्थगित केले़ हे आंदोलन आमगाव पूरतेच मर्यादित न ठेवता वर्धा उपविभागात म्हणजे सेलू, देवळी व वर्धा तालुक्यात राबविले जाणार असल्याचे अविनाश काकडे यांनी सांगितले़ शेतीची कामे आटोपत येताच वर्धा उपविभागात महिलांद्वारे पुन्हा गावोगावी चुलबंद आंदोलन करण्यात येणार आहे़ किमान या आंदोलनांचा आधार मिळून निर्मलग्राम योजना यशस्वी होईल, अशी आशा पदाधिकारी व अधिकारी व्यक्त करीत आहेत़ हे आंदोलन अन्य ठिकाणीही केले जाणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)