शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

‘धाम’तून पाटबंधारे सोडणार अखेरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:41 IST

वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर्धा पाटबंधारे विभाग येत्या काही दिवसात सोडणार आहे.

ठळक मुद्देमृतसाठा देणार आधार : वेळीच पाऊस न आल्यास नागरिकांवर पाणीबाणीची स्थिती ओढवणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर्धा पाटबंधारे विभाग येत्या काही दिवसात सोडणार आहे. उल्लेखनीय म्हणजे धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे वेळीच पाऊस न आल्यास येत्या काही दिवसात पाणी समस्या रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पाची ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, सध्या स्थितीत या प्रकल्पात केवळ ०.५ दलघमी उपयुक्त पाणी साठा आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता सदर प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करण्याचा प्रस्ताव वर्धा पाटबंधारे विभागाने तयार केला. शिवाय तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मुंबई दरबारी शासनाकडे सादर केला आहे.परंतु, या प्रस्तावावर अद्यापही कुठलाही विचार झाला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मृत जलसाठ्याची उचल कशी करावी, असा प्रश्न सध्या वर्धा पाटबंधारे विभागाला भेडसावत आहे. मृत जलसाठ्याची उचल करून तो गेट द्वारे सोडण्याचे वर्धा पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. जलाशयात असलेल्या ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठ्यासह जास्तीत जास्त २ दलघमी मृत पाणी साठा सोडण्याचा मानस पाटबंधारे विभागाचा आहे. येत्या काही दिवसात पाणी सोडण्यात येणार असून हे शेवटचेच ठरणार आहे. सुमारे २.५ दलघमी पाणी सोडल्यानंतर जलाशयातून आणखी किती पाण्याची उचल करता येईल याचा अंदाज पाटबंधारे विभागाला येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे.मृत जलसाठा ९ दलघमीधाम प्रकल्पात सध्या ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. असे असले तरी या जलाशयाच्या निर्मितीनंतर एकही वेळा त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही; पण यंदा जिल्हा प्रशासनाने धाम प्रकल्प गाळमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. उपयुक्त जलसाठा संपल्यानंतर या प्रकल्पात जास्तीत जास्त ९ दलघमी मृत जलसाठा राहू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आतापर्यंत एकही वेळा या प्रकल्पातील गाळ काढण्यात न आल्याने सध्या या प्रकल्पात ९ दलघमी मृत जलसाठा आहे काय याबाबतही ठामपणे अधिकाºयांना सांगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे मृत जलसाठ्याची पूर्णपणे उचल करता येत नाही.पाणी येण्यास लागतो दोन दिवसांचा कालावधीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वर्धा नगर पालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करते. सदर दोन्ही संस्था सुमारे ३६ हजार कुटुंबियांना याच पाण्याचा पुरवठा करते. असे असले तरी महाकाळी येथून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी व पवनार पर्यंत येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो.धाम प्रकल्पात अतीशय अल्प उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने मृतसाठ्याची उचल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. असे असले तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :riverनदी