शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

‘धाम’तून पाटबंधारे सोडणार अखेरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:41 IST

वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर्धा पाटबंधारे विभाग येत्या काही दिवसात सोडणार आहे.

ठळक मुद्देमृतसाठा देणार आधार : वेळीच पाऊस न आल्यास नागरिकांवर पाणीबाणीची स्थिती ओढवणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर्धा पाटबंधारे विभाग येत्या काही दिवसात सोडणार आहे. उल्लेखनीय म्हणजे धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे वेळीच पाऊस न आल्यास येत्या काही दिवसात पाणी समस्या रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पाची ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, सध्या स्थितीत या प्रकल्पात केवळ ०.५ दलघमी उपयुक्त पाणी साठा आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता सदर प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करण्याचा प्रस्ताव वर्धा पाटबंधारे विभागाने तयार केला. शिवाय तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मुंबई दरबारी शासनाकडे सादर केला आहे.परंतु, या प्रस्तावावर अद्यापही कुठलाही विचार झाला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मृत जलसाठ्याची उचल कशी करावी, असा प्रश्न सध्या वर्धा पाटबंधारे विभागाला भेडसावत आहे. मृत जलसाठ्याची उचल करून तो गेट द्वारे सोडण्याचे वर्धा पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. जलाशयात असलेल्या ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठ्यासह जास्तीत जास्त २ दलघमी मृत पाणी साठा सोडण्याचा मानस पाटबंधारे विभागाचा आहे. येत्या काही दिवसात पाणी सोडण्यात येणार असून हे शेवटचेच ठरणार आहे. सुमारे २.५ दलघमी पाणी सोडल्यानंतर जलाशयातून आणखी किती पाण्याची उचल करता येईल याचा अंदाज पाटबंधारे विभागाला येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे.मृत जलसाठा ९ दलघमीधाम प्रकल्पात सध्या ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. असे असले तरी या जलाशयाच्या निर्मितीनंतर एकही वेळा त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही; पण यंदा जिल्हा प्रशासनाने धाम प्रकल्प गाळमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. उपयुक्त जलसाठा संपल्यानंतर या प्रकल्पात जास्तीत जास्त ९ दलघमी मृत जलसाठा राहू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आतापर्यंत एकही वेळा या प्रकल्पातील गाळ काढण्यात न आल्याने सध्या या प्रकल्पात ९ दलघमी मृत जलसाठा आहे काय याबाबतही ठामपणे अधिकाºयांना सांगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे मृत जलसाठ्याची पूर्णपणे उचल करता येत नाही.पाणी येण्यास लागतो दोन दिवसांचा कालावधीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वर्धा नगर पालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करते. सदर दोन्ही संस्था सुमारे ३६ हजार कुटुंबियांना याच पाण्याचा पुरवठा करते. असे असले तरी महाकाळी येथून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी व पवनार पर्यंत येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो.धाम प्रकल्पात अतीशय अल्प उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने मृतसाठ्याची उचल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. असे असले तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :riverनदी