शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ग्रामीण सेवा सहकारी संस्था मोजताहेत अखेरच्या घटका

By admin | Updated: May 24, 2014 00:05 IST

सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे

 पिंपळखुटा : सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे ग्रामीण सहकारी संस्था आता नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याने अखेरच्या घटका मोजत आहेत. आर्वी ततालुक्यात एकूण ५० सहकारी संस्था आहे. पैकी बैद्यनाथन समिती व ९७ व्या घटनादुरूस्तीनुसार १३ संस्थांचे इतर संस्थेत विलिनीकरण करण्यात आल्याने ३७ संस्था कार्र्यरत असून २० गटसचिव या संस्थेचा कारभार पाहत आहेत. सध्या सहकारी संस्थेचे तालुक्यात ४ हजार ९५६ शेतकरी थकीत कर्जदार आहे. त्यांच्याकडून २७ कोटी ५३ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे. बर्‍याच शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करून राष्ट्रीयकृत बँकेचा रस्ता धरला आहे; परंतु सर्व शेतकरी सभासदाकडून ठेव म्हणून घेतलेली एकूण रक्कम ३ कोटी ७४ लाख रुपये आहे. जे शेतकरी इतर बँकेकडून कर्ज घेतात त्यांचेही शेअर्स या संस्थेत जमा आहे. ही ठेव परत मिळावी या आशेवर शेतकरी आहेत. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)