शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम दिवस : आज दिग्गजांची उमेदवारी - ४१ नामांकन

By admin | Updated: September 27, 2014 02:02 IST

आघाडी व युतीत झालेल्या घटस्फोटानंतर जिल्ह्यात नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

वर्धा : आघाडी व युतीत झालेल्या घटस्फोटानंतर जिल्ह्यात नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. शुक्रवारी चारही विधानसभा क्षेत्रात एकूण २५ जणांनी नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारपर्यंत चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ४१ नामांकन दाखल झाले आहे. हिंगणघाटात शिवसेनेकडून अशोक शिंदे, राष्ट्रवादीकडून राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, वर्धेत राष्ट्रवादीकडून सुरेश देशमुख, आर्वी काँग्रेसकडून अमर काळे, देवळीत भाजपाकडून सुरेश वाघमारे या दिग्गजांना आपले नामांकन दाखल दाखल केले आहेत. नामांकन दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उर्वरित दिग्गज उमेदवारी दाखल करणार असून शक्तिप्रदर्शनही बघायला मिळणार आहे. हिंगणघाट विधानसभाक्षेत्रातून पाच जणांनी ११ उमेदवारी अर्ज विकत घेतले. आतापर्यंत आठ जणांनी १६ अर्जांची खरेदी केली. देवळी विधानसभा क्षेत्रात भाजपकडून दोन नामांकन दाखल झाले आहे. यात भाजपच्या दिनेश शिरभाते यांचाही समावेश आहे. या विधानसभा क्षेत्रात आज एकूण ११ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत येथे एकूण १४ नामांकन दाखल झाले आहे.आर्वीत आर्वीत आतापर्यंत सात नामांकन दाखल झाले आहे. तर ९३ अर्जांचंी विक्री झाली आहे. या मतदार संघात भाजपाचा उमेदवार जरी निश्चित असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या उमेदवाराबाबतचा संभ्रम कायम आहे. कोणाच्या पदरात उमेदवारी पडते, याकडे राकाँ व सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.वर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजय हेडाऊ, डाव्या लोकशाहीतर्फे स्कर्मिश खडसे, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे किशोर किनकर यांनी नामांकन दाखल केले. भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. विधानसभा निवडणूक जाहीर झाली, त्या काळापासून सुरू असलेल्या युती व आघाडीच्या जागावाटपाचा तिढा गुरुवारी घटस्फोटाने सुटला. हा वाद सुरू असताना आता नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आली. शेवटच्या दिवशी कितीजण आपले नामांकन दाखल करते, याकडे आता लक्ष लागले आहे. कोण बंडखोरी करतो काय, याकडेही लक्ष लागले आहेत.(प्रतिनिधी)