शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

By admin | Updated: April 13, 2017 01:34 IST

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या;

रामदास तडस : भूदान शेतजमिनीतील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेत वर्धा : आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्याने त्या तशाच पडून होत्या. त्या जमिनी अधिकारी व भूमाफीयाच्या संगणमताने श्रीमंत व बिल्डरांना विकल्या गेल्यात. भूदानातील जमिनी देशातील भूमिहिन गोरगरीबांना मिळाव्या म्हणून भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीकडे खा. रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न विचारून लक्ष वेधले. देशातील गोरगरीब आणि शेतमजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी जमिनीचा तुकडा असावा. तसेच अनेक श्रीमंत लोकांकडे पडून असलेली जमिनी कष्टकऱ्यांना मिळावी, भूमिहिनांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. या चळवळीत मोठी जमीन असणाऱ्या जमीनदारांना जमिनीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशातील गोरगरीब जनतेकरिता आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ १९५१ पासून प्रारंभ केली. या चळवळीत देशातील लोकांनी २२ लाख ९० हजार एकर जमीन दान केली. पैकी १६ लाख ६६ हजार एकर जमीन देशातील भूमिहिनान्ाां वाटली; पण उर्वरित ६ लाख ३७ हेक्टर जमीन शिल्लक आहे. महाराष्ट्रात १ लाख ४ हजार हेक्टर जमीन आहे. त्यातील ०.२७ हेक्टर जमिनीचे वितरण झाले असून ७७ हजार हेक्टर जमिनीचे वाटप व्हायचे आहे. भूदानताील जमीन वाटपामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले. आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही भूमिहिन गोरगरीब जनतेलाच जमीन मिळावी म्हणून होती; पण अलिकडच्या काळात अनेक मोठे घोटाळे बाहेर येऊ लागले. याबाबत खा. तडस यांनी लोकसभेत १८ डिसेंबर २०१४ ला अतारांकित प्रश्न व ५ मार्च २०१५ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आज नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधले. वर्धा जिल्ह्यात भूदानची १९८० हेक्टर जमीन असून ११८ हेक्टरचे अद्याप वाटप झाले नाही. अलिकडच्या काळात गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केले तर कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.(जिल्हा प्रतिनिधी)