शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

By admin | Updated: April 13, 2017 01:34 IST

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या;

रामदास तडस : भूदान शेतजमिनीतील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेत वर्धा : आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्याने त्या तशाच पडून होत्या. त्या जमिनी अधिकारी व भूमाफीयाच्या संगणमताने श्रीमंत व बिल्डरांना विकल्या गेल्यात. भूदानातील जमिनी देशातील भूमिहिन गोरगरीबांना मिळाव्या म्हणून भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीकडे खा. रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न विचारून लक्ष वेधले. देशातील गोरगरीब आणि शेतमजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी जमिनीचा तुकडा असावा. तसेच अनेक श्रीमंत लोकांकडे पडून असलेली जमिनी कष्टकऱ्यांना मिळावी, भूमिहिनांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. या चळवळीत मोठी जमीन असणाऱ्या जमीनदारांना जमिनीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशातील गोरगरीब जनतेकरिता आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ १९५१ पासून प्रारंभ केली. या चळवळीत देशातील लोकांनी २२ लाख ९० हजार एकर जमीन दान केली. पैकी १६ लाख ६६ हजार एकर जमीन देशातील भूमिहिनान्ाां वाटली; पण उर्वरित ६ लाख ३७ हेक्टर जमीन शिल्लक आहे. महाराष्ट्रात १ लाख ४ हजार हेक्टर जमीन आहे. त्यातील ०.२७ हेक्टर जमिनीचे वितरण झाले असून ७७ हजार हेक्टर जमिनीचे वाटप व्हायचे आहे. भूदानताील जमीन वाटपामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले. आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही भूमिहिन गोरगरीब जनतेलाच जमीन मिळावी म्हणून होती; पण अलिकडच्या काळात अनेक मोठे घोटाळे बाहेर येऊ लागले. याबाबत खा. तडस यांनी लोकसभेत १८ डिसेंबर २०१४ ला अतारांकित प्रश्न व ५ मार्च २०१५ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आज नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधले. वर्धा जिल्ह्यात भूदानची १९८० हेक्टर जमीन असून ११८ हेक्टरचे अद्याप वाटप झाले नाही. अलिकडच्या काळात गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केले तर कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.(जिल्हा प्रतिनिधी)