शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

By admin | Updated: April 13, 2017 01:34 IST

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या;

रामदास तडस : भूदान शेतजमिनीतील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेत वर्धा : आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्याने त्या तशाच पडून होत्या. त्या जमिनी अधिकारी व भूमाफीयाच्या संगणमताने श्रीमंत व बिल्डरांना विकल्या गेल्यात. भूदानातील जमिनी देशातील भूमिहिन गोरगरीबांना मिळाव्या म्हणून भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीकडे खा. रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न विचारून लक्ष वेधले. देशातील गोरगरीब आणि शेतमजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी जमिनीचा तुकडा असावा. तसेच अनेक श्रीमंत लोकांकडे पडून असलेली जमिनी कष्टकऱ्यांना मिळावी, भूमिहिनांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. या चळवळीत मोठी जमीन असणाऱ्या जमीनदारांना जमिनीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशातील गोरगरीब जनतेकरिता आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ १९५१ पासून प्रारंभ केली. या चळवळीत देशातील लोकांनी २२ लाख ९० हजार एकर जमीन दान केली. पैकी १६ लाख ६६ हजार एकर जमीन देशातील भूमिहिनान्ाां वाटली; पण उर्वरित ६ लाख ३७ हेक्टर जमीन शिल्लक आहे. महाराष्ट्रात १ लाख ४ हजार हेक्टर जमीन आहे. त्यातील ०.२७ हेक्टर जमिनीचे वितरण झाले असून ७७ हजार हेक्टर जमिनीचे वाटप व्हायचे आहे. भूदानताील जमीन वाटपामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले. आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही भूमिहिन गोरगरीब जनतेलाच जमीन मिळावी म्हणून होती; पण अलिकडच्या काळात अनेक मोठे घोटाळे बाहेर येऊ लागले. याबाबत खा. तडस यांनी लोकसभेत १८ डिसेंबर २०१४ ला अतारांकित प्रश्न व ५ मार्च २०१५ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आज नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधले. वर्धा जिल्ह्यात भूदानची १९८० हेक्टर जमीन असून ११८ हेक्टरचे अद्याप वाटप झाले नाही. अलिकडच्या काळात गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केले तर कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.(जिल्हा प्रतिनिधी)