शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

महामार्गाच्या कामापूर्वीच शेतकऱ्यांना भूखंड

By admin | Updated: October 4, 2016 01:51 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रासाठी मिळालेल्या जमिनीचे ले-आऊट तयार करून लॉटरी पद्धतीने

राधेश्याम मोपलवार : महामार्गामुळे एक लाख रोजगाराची संधी वर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रासाठी मिळालेल्या जमिनीचे ले-आऊट तयार करून लॉटरी पद्धतीने भूसंचयन करणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील भूखंडाचे हक्क दिल्यानंतरच महामार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल. महामार्गाचे काम आणि कृषी समृद्धी केंद्रातील मुलभूत सुविधांची कामे सोबत-सोबत करण्यात येतील. त्यामुळे रस्ता तयार होईपर्यंत कृषी समृद्धी केंद्र उद्योग येण्यासाठी पूर्णपणे तयार झाले असेल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गासंबंधी कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मोपलवार बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी जी.एच. भूगावकर, प्रकाश शर्मा, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे यु.व्ही.डाबे, भूसंपादन अधिकारी सुके, तहसीलदार व तलाठी उपस्थित होेते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर ते थेट मुंबई-गुजरात पर्यंत जलद प्रवासाठी सहा पदरी महामार्ग आहेत. पुणे-मुंबई तसेच नाशिक-मुंबई रस्ते सुद्धा महामार्ग आहेत. त्यामुळे तेथील कच्चा माल तत्काळ मुंबईला पाठविण्यात येतो. तसेच तेथील उद्योगांनाही यामुळे जलद माल पाठविता येतो. पण विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यामध्ये तत्काळ मुंबईला नाशिवंत वस्तु पाठविण्यासाठी ३६ तास लागतात. ज्या-ज्या शहराच्या बाजूला महामार्ग आहेत तिथे रस्त्याच्या बाजुला उद्योग, व्यवसाय सुरू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे पुढील १० वर्षात या भागात १ लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात जात नाही ते शेतकरी रस्त्याच्या बाजूला उद्योग, व्यवसाय सुरू करतात, आणि ज्यांची जमीन प्रकल्पामध्ये गेली ते उध्वस्त होतात. प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मिळावा म्हणून भूसंचयन संकल्पना राबविण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) व्यवसायाकरिता बँकांची मदत ४वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जगाला तत्वज्ञान देणारा सर्वोत्तम जिल्हा तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे. वर्धेसाठी नाट्यगृह, अत्याधुनिक बसस्थानक, देवळीला स्टेडीयम तसेच लोअर वर्धा २०१७ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाणी देण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्याचे आवाहन या सरकारने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.