शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

आदेशाविनाच भूदानातील जमिनीचे हस्तांतरण

By admin | Updated: September 9, 2015 02:07 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात प्राप्त जमिनीचे वाटप भूदान मंडळामार्फत केले जाते.

तलाठ्याने वापरले एसडीओंचे अधिकार : एकाच्या जमिनीवर दुसऱ्यानेच उचलले कर्जवर्धा : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात प्राप्त जमिनीचे वाटप भूदान मंडळामार्फत केले जाते. माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांना या जमिनी दिल्या जातात. यातील जमिनींची विक्री, हस्तांतरण होत नाही; पण तलाठ्याने वरिष्ठांचे अधिकार वापरत सातबारावर खोडतोड करून जमीन दुसऱ्याच्या नावावर केली. इतकेच नव्हे तर सदर महिलेने त्यावर कर्जाचीही उचल केली. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने न घेतलेले कर्ज फेडण्याची व जमीन गमविण्याची वेळ महिलेवर आली. आर्वी तालुक्यातील मौजा कृष्णापूर येथील शेत सर्व्हे क्र. ९/१, आराजी १.०४ हेक्टर आर शेतजमीन ३० जून २००९ मध्ये सुमित्रा नारायण चौधरी रा. करंजी (काजी) यांना प्राप्त झाली. ३१ डिसेंबर २००१ नुसार सदर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. या जमिनीवर सदर महिला शेतकरी शेती करीत होत्या. दरम्यान कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश नसताना तलाठ्याने ही जमीन सुमित्र व्यंकटी कासार रा. कृष्णापूर यांच्या नावाने करण्यात आली. यासाठी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही तर केवळ सातबारावर खोडतोड करून हा प्रकार करण्यात आला. शेतीचा अभिलेख हा नियमानुसार वरिष्ठांच्या मंजुरीने वा आदेशाने दुरूस्त होणे गरजेचे असते; पण तलाठ्यानेच वरिष्ठांचे अधिकार वापरून हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर सुमित्रा व्यंकटी कासार यांनी याच सातबाराचा वापर करीत राष्ट्रीयकृत बँकेतून कर्जाची उचलही केली. याबाबत तलाठी दप्तर निरीक्षणाची जबाबदारी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व प्रसंगी जिल्हाधिकारी यांची असते; पण सर्वच स्तरावरून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जमीन ही सुमित्रा नारायण चौधरी यांची तर नंतर गाव नमूना १२ हा सुमित्रा व्यंकटी कासार यांच्या नावाने लिहिला गेला. या संपूर्ण प्रकारामुळे कासार यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड चौधरी यांच्यावर आली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुमित्रा चौधरी यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक खरांगणा (मो.) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनातून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)भूदान मंडळाकडून वितरित जमिनीचे घोळ सुरूचभूदान मंडळाकडून वितरित जमिनींच्या वितरणातील घोळ थांबतच नसल्याचे दिसते. कृष्णापूर येथे तर एका महिलेची शेती परस्पर दुसऱ्याच महिलेच्या नावे करण्यात आली. या प्रकारामुळे लाभार्थी महिलेवर संकट कोसळले आहे. शिवाय न घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ त्या महिलेवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसडीओंच्या कारवाईकडे लक्षभूदान जमीन घोटाळ्यामध्ये जिल्ह्यातील तीनही उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; पण अद्याप कुठल्याही हालचाली झाल्याचे दिसत नाही. आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांकडेही काही प्रकरणे प्रलंबित असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तहसीलदारासह ठाणेदाराला निवेदनभूदानात मिळालेल्या जमिनीच्या प्रकरणात झालेल्या अनागोंदी प्रकरणी लाभार्थ्यांने आर्वी तहसीलदारासह खरांगणा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे.