शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार योजना लोकाभिमुखच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:43 IST

केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले.

ठळक मुद्देअतुल तराळे : नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले. सदर योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरातील विविध भागात कामे सुरू असून लोकाभिमुख असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले आहे.नगर पालिका यांच्याकडे योग्य तो तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्यामुळे भुयारी गटार योजना करण्यात तज्ञ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून योजना तयार करून त्या योजनेचे कामावर त्यांचकडूनच देखरेख करून घेण्यात यावी. तसेच योजना कशाप्रकारे तयार करावी याबाबत केंद्र सरकार तसेच संबंधित विभागाकडून सीपीएचईईओ मॅन्युअल नुसार योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर सुचनांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वर्धा शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. शहराची भौगोलिक रचना लक्षात घेता शहराचे सहा झोन तयार करण्यात आले. शिवाय एसटीपी झोनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आराखडे, नकाशे यांची तपासणी करून सचिव स्तरावरून मंजूरी प्रदान करण्यात आली. योजनेची किंमत १०१.२२ कोटी, वित्तीय आकृतिबंध, केंद्रशासन अनुदान ५० टक्के ५०.६१ कोटी, राज्य शासन अनुदान २५ टक्के २५.३० कोटी, लोकवर्गणी २५ टक्के २५.३० कोटी आहे. योजनेमध्ये ८५ कि़मी लांबीची मलवाहिनी टाकणे, डबल वाल करोगेटेड पाईप १५० मि.मी. ते २५० मि.मी. तसेच आर.सी.सी. पाईप ३०० मि.मी. ते ८०० मी.मी. साईजपर्यंत टाकुन १७ एमएलडी विक्रमशिला झोनमध्ये व बोरगाव झोन मधील नाल्यावर बंधारा बांधने व ५ ठिकाणी रेल्वे रूळाखालून पाईप लाईन टाकणे प्रस्तावित आहे. सन २०५० चे प्रस्तावित लोकसंख्येनुसार ही योजना आहे. विविध बाबी लक्षात घेऊन संपूर्ण शहरात टाकायवयाच्या पाईप लाईनचा व्यास निश्चित झाला आहे. पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नये यासाठी ही भुयारी गटार योजना फायद्याची असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.योजनेचे फायदेडासांची निर्मिती कमी होईल. शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार नाही. पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाही, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.