शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

भुयारी गटार योजना लोकाभिमुखच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:43 IST

केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले.

ठळक मुद्देअतुल तराळे : नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले. सदर योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरातील विविध भागात कामे सुरू असून लोकाभिमुख असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले आहे.नगर पालिका यांच्याकडे योग्य तो तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्यामुळे भुयारी गटार योजना करण्यात तज्ञ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून योजना तयार करून त्या योजनेचे कामावर त्यांचकडूनच देखरेख करून घेण्यात यावी. तसेच योजना कशाप्रकारे तयार करावी याबाबत केंद्र सरकार तसेच संबंधित विभागाकडून सीपीएचईईओ मॅन्युअल नुसार योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर सुचनांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वर्धा शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. शहराची भौगोलिक रचना लक्षात घेता शहराचे सहा झोन तयार करण्यात आले. शिवाय एसटीपी झोनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आराखडे, नकाशे यांची तपासणी करून सचिव स्तरावरून मंजूरी प्रदान करण्यात आली. योजनेची किंमत १०१.२२ कोटी, वित्तीय आकृतिबंध, केंद्रशासन अनुदान ५० टक्के ५०.६१ कोटी, राज्य शासन अनुदान २५ टक्के २५.३० कोटी, लोकवर्गणी २५ टक्के २५.३० कोटी आहे. योजनेमध्ये ८५ कि़मी लांबीची मलवाहिनी टाकणे, डबल वाल करोगेटेड पाईप १५० मि.मी. ते २५० मि.मी. तसेच आर.सी.सी. पाईप ३०० मि.मी. ते ८०० मी.मी. साईजपर्यंत टाकुन १७ एमएलडी विक्रमशिला झोनमध्ये व बोरगाव झोन मधील नाल्यावर बंधारा बांधने व ५ ठिकाणी रेल्वे रूळाखालून पाईप लाईन टाकणे प्रस्तावित आहे. सन २०५० चे प्रस्तावित लोकसंख्येनुसार ही योजना आहे. विविध बाबी लक्षात घेऊन संपूर्ण शहरात टाकायवयाच्या पाईप लाईनचा व्यास निश्चित झाला आहे. पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नये यासाठी ही भुयारी गटार योजना फायद्याची असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.योजनेचे फायदेडासांची निर्मिती कमी होईल. शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार नाही. पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाही, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.