शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार योजना लोकाभिमुखच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:43 IST

केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले.

ठळक मुद्देअतुल तराळे : नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले. सदर योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरातील विविध भागात कामे सुरू असून लोकाभिमुख असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले आहे.नगर पालिका यांच्याकडे योग्य तो तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्यामुळे भुयारी गटार योजना करण्यात तज्ञ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून योजना तयार करून त्या योजनेचे कामावर त्यांचकडूनच देखरेख करून घेण्यात यावी. तसेच योजना कशाप्रकारे तयार करावी याबाबत केंद्र सरकार तसेच संबंधित विभागाकडून सीपीएचईईओ मॅन्युअल नुसार योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर सुचनांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वर्धा शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. शहराची भौगोलिक रचना लक्षात घेता शहराचे सहा झोन तयार करण्यात आले. शिवाय एसटीपी झोनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आराखडे, नकाशे यांची तपासणी करून सचिव स्तरावरून मंजूरी प्रदान करण्यात आली. योजनेची किंमत १०१.२२ कोटी, वित्तीय आकृतिबंध, केंद्रशासन अनुदान ५० टक्के ५०.६१ कोटी, राज्य शासन अनुदान २५ टक्के २५.३० कोटी, लोकवर्गणी २५ टक्के २५.३० कोटी आहे. योजनेमध्ये ८५ कि़मी लांबीची मलवाहिनी टाकणे, डबल वाल करोगेटेड पाईप १५० मि.मी. ते २५० मि.मी. तसेच आर.सी.सी. पाईप ३०० मि.मी. ते ८०० मी.मी. साईजपर्यंत टाकुन १७ एमएलडी विक्रमशिला झोनमध्ये व बोरगाव झोन मधील नाल्यावर बंधारा बांधने व ५ ठिकाणी रेल्वे रूळाखालून पाईप लाईन टाकणे प्रस्तावित आहे. सन २०५० चे प्रस्तावित लोकसंख्येनुसार ही योजना आहे. विविध बाबी लक्षात घेऊन संपूर्ण शहरात टाकायवयाच्या पाईप लाईनचा व्यास निश्चित झाला आहे. पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नये यासाठी ही भुयारी गटार योजना फायद्याची असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.योजनेचे फायदेडासांची निर्मिती कमी होईल. शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार नाही. पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाही, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.