शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

गावची जमीन गावातीलच भूमिहिनांना द्यावी

By admin | Updated: January 4, 2017 00:34 IST

गावात शासनाकडे मोठी जमीन आहे. या जमिनीचे पट्टे मिळावे, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी ग्रा.पं. कडे केली होती.

ग्रामसभेत ठराव घ्यावा : भूमिहिन नागरिकांची मागणी टाकरखेड : गावात शासनाकडे मोठी जमीन आहे. या जमिनीचे पट्टे मिळावे, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी ग्रा.पं. कडे केली होती. यावरून शासकीय जमीन गावातील भूमिहीन नागरिकांनाच देण्यात यावी, असा ठराव ग्रा.पं. ने विशेष ग्रामसभा बोलवून घ्यावी. याबाबत संबंधित महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी भूमिहीन नागरिकांनी केली आहे. गजानन हांडे व ग्रामस्थांनी लेखी निवेदनातून गावातील शासकीय जमिनीवर स्थानिकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे याबाबत ग्रा.पं. ने ग्रामसभा घेत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रस्ताव देण्याची मागणी केली आहे. मौजा टाकरखेड येथील बरीच जमीन शासनाकडे जमा आहे. यातील काही जमीन बाहेरगावातील लाभार्थ्यांना देण्यात आली; पण गावातील भूमिहीन जमिनीपासून वंचित आहे. या गावातील जमीन बाहेर गावातील धरणग्रस्त, माजी सैनिकांना देण्यात आली. काही जमीन वाहतीत आहे तर काही दुसऱ्याला मक्त्याने देण्यात आली. काही पडिक आहे. जे स्वत: राबत नाही, ज्यांना गरज नाही, अशाांना जमिनी देऊन उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ती जमीन गावातील भूमिहीन नागरिकांना मिळाली असती तर त्यावर त्यांचा उदरनिर्वाह झाला असता. गावात मोठ्या प्रमाणात भूमिहीन नागरिक आहे. मजुरीवर प्रपंच्याचा गाडा चालविणे अवघड असल्याने त्यांना दुसऱ्याची जमीन मक्त्याने करून दिवस काढावे लागत आहे. ज्यांना जमीन मिळाली, ते दुसऱ्याला लावून देतात; मग, अशा लाभार्थ्यांना जमीन देऊन उपयोग काय, त्यापेक्षा गावातील जमीन गावातील भूमिहीन नागरिकाला दिल्यास त्याचा खरा उपयोग होईल. यामुळे आता उर्वरित असलेली शासकीय जमीन व पडिक जमीन गावातील भूमिहीनांना देण्यात यावी, असा ठराव ग्रामपंचायतीने घ्यावा आणि संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी लेखी निवेदनातून भूमिहीनांद्वारे करण्यात आली आहे.(वार्ताहर)