शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

अस्वलाच्या दहशतीने माणिकवाडावासी शेताकडे फिरकलेच नाही

By admin | Updated: July 27, 2016 00:02 IST

तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू: दोन पिलांसह अस्वलाचा बुधलागड परिसरात धुमाकुळ अमोल सोटे आष्टी (शहीद) तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. तरीही हिंमतीने जंगलव्याप्त भागात असलेल्या शेतीत ते कामे करीत आहेत. अशातच जंगलात जनावरे चारण्याकरिता गेलेल्या एका गुराख्यावर अस्वलासह तिच्या पिलाने हल्ला चढविला. या हल्ल्यात गुराख्याच्या शरीरावरील जखमा पाहून गावकरी धास्तावले असून ती भीती त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. माणिकवाडा गावातील गुराखी पद्माकर डाखोळे याच्यावर अस्वलासह तिच्या दोन्ही पिलांनी जोरदार हल्ला केल्याने पद्माकर मृत्यूच्या दारात उभा आहे. शेतामध्ये ठाण मांडून बसलेली अस्वल जंगलातून जाते तोच लगेच शेतात परत येते, वनविभागाचे कर्मचारी दिवसभर तिचा शोध घेत आहे; मात्र त्यांच्या हाती अद्याप काहीच लागले नाही. यामुळे या अस्वलाची दहशत गावात पसरली असून वनविभागाने याकडे लक्ष देत मार्ग काढण्याची मागणी होत आहे. माणिकवाडा या जंगलव्याप्त गावात जंगली प्राण्यांची नेहमीच ये-जा असते. याची माहिती असताना केवळ वेळ चुकल्याने पद्माकरच्या जीवावर बेतले. तो नेहमीप्रमाणे गुरे घेवून बुधलागड टेकडीच्या मागील परिसरात गेल्या. सूर्यास्ताच्या समयी आपली गुरे घेवून तो घराकडे निघाला. एवढ्यात मागाहून येत अस्वलाने झडप घातली. हिमतीने पक्का असलेला पद्माकर प्रतिकार करू लागला; मात्र तिच्या दोन पिलांनी अक्षरश: पद्माकरचा चेहरा ओरबडून टाकला. पाठीच्या अवयवाचे लचके तोडले. क्षणार्धात सगळ्या घडामोडी झाल्या. आजूबाजूला कोणीच नसल्याने त्याच किंचाळ्यांचा आवाज कानी पडला नाही. एवढा मोठा हल्ला होवूनही पद्माकरने गावातील एकाला फोन करून सगळी माहिती दिली. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी मिळून जंगलाकडे धाव घेतली. गंभीर अवस्थेत त्याला घरी आणले. याची माहिती पूर्ण गावकऱ्यांना झाल्यावर त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या घटनेला आज चार दिवसांचा कालावधी होत असला तरी त्याची भीती गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. ज्या भागात घटना घडली त्या भागातील एकही शेतकरी त्या जंगलाच्या दिशेने फिरकला नाही. शिवाय गावात अस्वल येणार तर नाही ना, या चिंतेने गावकरी भयग्रस्त आहेत. ३ हजार ५०० लोकवस्ती असलेल्या गावात अस्वलाने भीती निर्माण केल्याने वनविभागाच्या मागे रक्षण व पहारा करण्याचे काम लागले आहे. १५ जणांची चमू सतत बंदोबस्तावर तैनात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार नागपूरला पद्माकरच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखाण्यात आहे. त्याचा पूर्ण वैद्यकीय खर्च वनविभाग करणार असून त्याच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी याकरिता वरिष्ठांकडे प्रकरणाचा अहवाल पाठविल्याचे वनविभागाच्यावतीने सांगितले आहे.