शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या दहशतीने माणिकवाडावासी शेताकडे फिरकलेच नाही

By admin | Updated: July 27, 2016 00:02 IST

तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू: दोन पिलांसह अस्वलाचा बुधलागड परिसरात धुमाकुळ अमोल सोटे आष्टी (शहीद) तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. तरीही हिंमतीने जंगलव्याप्त भागात असलेल्या शेतीत ते कामे करीत आहेत. अशातच जंगलात जनावरे चारण्याकरिता गेलेल्या एका गुराख्यावर अस्वलासह तिच्या पिलाने हल्ला चढविला. या हल्ल्यात गुराख्याच्या शरीरावरील जखमा पाहून गावकरी धास्तावले असून ती भीती त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. माणिकवाडा गावातील गुराखी पद्माकर डाखोळे याच्यावर अस्वलासह तिच्या दोन्ही पिलांनी जोरदार हल्ला केल्याने पद्माकर मृत्यूच्या दारात उभा आहे. शेतामध्ये ठाण मांडून बसलेली अस्वल जंगलातून जाते तोच लगेच शेतात परत येते, वनविभागाचे कर्मचारी दिवसभर तिचा शोध घेत आहे; मात्र त्यांच्या हाती अद्याप काहीच लागले नाही. यामुळे या अस्वलाची दहशत गावात पसरली असून वनविभागाने याकडे लक्ष देत मार्ग काढण्याची मागणी होत आहे. माणिकवाडा या जंगलव्याप्त गावात जंगली प्राण्यांची नेहमीच ये-जा असते. याची माहिती असताना केवळ वेळ चुकल्याने पद्माकरच्या जीवावर बेतले. तो नेहमीप्रमाणे गुरे घेवून बुधलागड टेकडीच्या मागील परिसरात गेल्या. सूर्यास्ताच्या समयी आपली गुरे घेवून तो घराकडे निघाला. एवढ्यात मागाहून येत अस्वलाने झडप घातली. हिमतीने पक्का असलेला पद्माकर प्रतिकार करू लागला; मात्र तिच्या दोन पिलांनी अक्षरश: पद्माकरचा चेहरा ओरबडून टाकला. पाठीच्या अवयवाचे लचके तोडले. क्षणार्धात सगळ्या घडामोडी झाल्या. आजूबाजूला कोणीच नसल्याने त्याच किंचाळ्यांचा आवाज कानी पडला नाही. एवढा मोठा हल्ला होवूनही पद्माकरने गावातील एकाला फोन करून सगळी माहिती दिली. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी मिळून जंगलाकडे धाव घेतली. गंभीर अवस्थेत त्याला घरी आणले. याची माहिती पूर्ण गावकऱ्यांना झाल्यावर त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या घटनेला आज चार दिवसांचा कालावधी होत असला तरी त्याची भीती गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. ज्या भागात घटना घडली त्या भागातील एकही शेतकरी त्या जंगलाच्या दिशेने फिरकला नाही. शिवाय गावात अस्वल येणार तर नाही ना, या चिंतेने गावकरी भयग्रस्त आहेत. ३ हजार ५०० लोकवस्ती असलेल्या गावात अस्वलाने भीती निर्माण केल्याने वनविभागाच्या मागे रक्षण व पहारा करण्याचे काम लागले आहे. १५ जणांची चमू सतत बंदोबस्तावर तैनात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार नागपूरला पद्माकरच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखाण्यात आहे. त्याचा पूर्ण वैद्यकीय खर्च वनविभाग करणार असून त्याच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी याकरिता वरिष्ठांकडे प्रकरणाचा अहवाल पाठविल्याचे वनविभागाच्यावतीने सांगितले आहे.