शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

करारनाम्यावरच रखडली भूसंपादन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:20 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली.

ठळक मुद्देशेतीही पडित । न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. अन्यायग्रस्त शेतकºयांनी मोबदला तातडीने देण्याची मागणी केली असून अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीकरिता १८ जानेवारी २०१९ ला सूचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर भूसंपादनाची घोषणा करण्यात आली. पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील ८७ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली. शेतकºयांनी भूमापनाकरिता संमती दिल्यानंतर मोजणी झाली. या प्रक्रियेअंतर्गत उपविभागीय अधिकारी, वर्धा यांच्याकडे आक्षेप मागविण्यात आले होते. भूसंपादनाकरिता दाव्याची रक्कम व तपशील अर्ज करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. एमएसआरडीसीतर्फे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला. मोबदल्याच्या रकमेविषयी शेतकºयांना अवगत करण्यासोबतच पैसे आठ दिवसांत जमा होतील, शेती करू नका असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन घेण्याकरिता दुसरीकडे पैसे देऊन करारनामा केला. महिनाभरानंतर शेतकरी विचारणा करण्यास गेले असता डिझाईन चेंज झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करारनामे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याबाबत ठामपणे सांगण्यात आले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे शेती पडीत ठेवल्याने नुकसान झाले. करार केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पिपरी, पांढरकवडा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.