शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

शेतकऱ्यांना भूमी संचयनासह भूमिअधिग्रहणाचाही पर्याय

By admin | Updated: September 23, 2016 02:24 IST

नागपूर-मुंबई हा निव्वळ समृद्धी मार्ग नव्हे, तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तो कृषी समृद्धी मार्ग होय.

रामदास तडस यांची माहिती : नागपूर-मुंबई हा विदर्भासाठी कृषी समृद्धी मार्गवर्धा : नागपूर-मुंबई हा निव्वळ समृद्धी मार्ग नव्हे, तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तो कृषी समृद्धी मार्ग होय. शेतकऱ्यांना भूसंचयनाच्या माध्यामातून मोबदला मिळणार असला तरी ज्या शेतकऱ्यांना भूमीसंचय करायचे नाही, अशा शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहण कायद्यांतर्गत रेडीरेकनरच्या जास्तीत जास्त दरानुसार पावणे चार पट रक्कम घेता येणार आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. असा प्रसार केला जात आहे. वास्तविक, हा मार्ग विदर्भातील शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत जावा. त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी. देशातील दळणवळण विदर्भाशी जोडली जावी, विदर्भ विकासाला चालना मिळावी, असे अनेक महत्त्वाचे हेतू समोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ड्रिम प्रोजेक्ट तयार केला आहे. यामुळे या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांचाही भूमीसंचयनाच्या माध्यमातून विचार केला आहे. ज्या शेतकऱ्यांना भूमीसंचयन करायचे नाही, अशा शेतकऱ्यांना भूमीअधिग्रहण कायद्यानुसार आपली शेती देता देणारा आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पावणे चार पट रक्कम मोबदला मिळणार आहे, असेही खा. तडस यावेळी म्हणाले. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यातील ३५ गावांमधून हा कृषी समृद्धी मार्ग जाणार आहे. सेलू तालुक्यात जमिनीचे रेडीरेकनर दर किमान दर हेक्टरी ३ लाख ५७ हजार रुपये इतके तर कमाल हेक्टरी दर १३ लाख रुपये इतके आहे. वर्धा तालुक्यात किमान दर ४ लाख ७२ हजार ५००, तर कमाल दर ९ लाख ७१ हजार २५० इतके आहे. आर्वी तालुक्यात किमान दर २ लाख ३७ हजार ६०० तर कमाल दर ७ लाख ३९ हजार ८०० रुपये इतका आहे. यानुसार शेतकऱ्यांना चार पट मोबदला मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांना निम्मी शेती भूसंचयन आणि निम्म्या शेतीचा पूर्ण मोबदला घ्यायचा आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे गेलेला आहे, असेही खा. तडस म्हणाले.या मार्गावर वर्धा जिल्ह्यात चिचघाट ता. सेलू, गणेशपूर ता. वर्धा व बोरी विरुळ ता. आर्वी अशा तीन ठिकाणी वसाहती स्थापन करण्यात येणार आहे. तेथे लागणाऱ्या जमिनीसाठीसुद्धा याच पद्धतीने मोबदला दिला जाणार आहे. २०१९ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. विदर्भासोबतच महाराष्ट्राचा विकास हा विकास राज्य शासाने स्पष्ट केला असल्याची माहितीही खा. तडस यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)