शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

एक्स्प्रेस हायवेसाठी भूसंपादन नव्हे भूसंचयन होणार

By admin | Updated: August 20, 2016 02:05 IST

मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गांना जोडणारा व महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांशी थेट संपर्कात येणारा एक्स्प्रेस हायवे आर्वी तालुक्यातील काही गावांतून जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद : ५२ हजार हेक्टर शेती प्रकल्पात जाण्याचा अंदाज आर्वी : मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गांना जोडणारा व महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांशी थेट संपर्कात येणारा एक्स्प्रेस हायवे आर्वी तालुक्यातील काही गावांतून जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन नाही तर भूसंचयन करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पात शेतकरी हे भागीदारी स्वरूपात सहभागी राहणार आहे. शेती उद्योगाशी संबंधीत उद्योग, इतर सोईसुविधा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आर्वीतील पंचायत समिती सभागृहात या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होते. या नव्या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील त्या आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये व यावर दरवर्षी १० टक्के वाढ देण्यात येणार आहे. प्रकल्पात शेतकऱ्यांची जेवढी जमीन जाईल तेवढा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल. हा एक्स्प्रेस हायवे मुंबई-नागपूर सह राज्यातील २४ जिल्ह्यांना थेट जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांसाठी याच परिसरात शेती पुरक उद्योग, रोजगाराची नवी साधने व इतर सोईसुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाशेजारी नवीन शहर बसवून तेथे बहुसंख्य शेतकरी सांगेल तो उद्योग, शाळा, रोजगाराची साधने व शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची सुविधा राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिली. उद्योगासाठी शेतकऱ्यांना बँकांची लोन सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी विरूळ गाव परिसरातील जिरायती क्षेत्राची जमीन लागणार आहे. या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची १०० टक्के शेती जाईल त्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या भागात कृषी समृद्धी प्रकल्प इतर उद्योग तसेच बाधीत गावातील शेतकरी म्हणतील तोच उद्योग आणल्या जाईल. शेतकऱ्यांच्या मताला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वेगवान बाजारपेठ उपलब्ध करून शेतकरी आपला उत्पादित माल त्वरीत इतर बाजारपेठेत नेवून विकू शकणार आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांची अधिक भागीदारी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली. तालुक्यातील ५२ हजार एकर शेती या प्रकल्पात जाणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी आमदार अमर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर, तहसीलदार राम पवार, एमएमआयडीचे अधिकारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)