शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

रेल्वेच्या दोन प्रकल्पांसाठी २९ गावात भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:45 IST

वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.

ठळक मुद्देशुभवार्ता : वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.वर्धा-नांदेड हा नवीन रेल्वे मार्ग नागरिकांसाठी फायद्याचा ठरणारा असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे. त्याबाबतची घोषणा झाल्यानंतर भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करीत सदर जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत होत प्रत्यक्ष कामाला कशी लवकरात लवकर सुरूवात करता येईल यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाच्या भुसंपादन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. अल्पावधीतच या विभागाने संपूर्ण २६ गावातील जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना बºयापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. तर वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यात एकूण नऊ गावातील जमीन संपादीत करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी तीन गावातील जमीन संपादीत करण्यात आली आहे. शिवाय उर्वरित सहा गावातील जमीन संपादन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. सोमवारी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासनातील भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी बैठक घेवून चर्चा केली. शिवाय काही भूसंपादनाचे प्रकरणांवर सकारात्मक चर्चेअंती तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा-नागपूर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनची प्रक्रिया मोजणीस्तरावरवर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण दहा गावांमध्ये जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. सध्या सदर प्रकल्पाचा विषय मोजणी स्तरावर आहे. लवकरच मोजणी पूर्ण करून जमिनीचे संपादन करीत ही दहा गावांमधील जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.तीन महिन्यांत होईल संपादनाची प्रक्रिया पूर्णरेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी व संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन रेल्वे विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. राज्य शासन ही जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत करणार असून ही संपूर्ण प्रक्रिया येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले.अडचणींवर मात करण्याच्या सूचनासदर चारही प्रकल्पांसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासंदर्भात येणाºया अडचणी तत्काळ दूर कराव्या, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रेल्वे विभाग व जलसंपदा विभागाच्या बैठकीत या सूचना मोजणी विभागाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.वर्धा-नांदेड या नव्या रेल्वे लाईनसाठी २६ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी आतापर्यंत तीन गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तर वर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया मोजणी स्तरावर आहे. यद्धपातळीवर हे काम होत आहे.- चंद्रभान पराते, उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, वर्धा.