शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या दोन प्रकल्पांसाठी २९ गावात भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:45 IST

वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.

ठळक मुद्देशुभवार्ता : वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.वर्धा-नांदेड हा नवीन रेल्वे मार्ग नागरिकांसाठी फायद्याचा ठरणारा असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे. त्याबाबतची घोषणा झाल्यानंतर भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करीत सदर जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत होत प्रत्यक्ष कामाला कशी लवकरात लवकर सुरूवात करता येईल यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाच्या भुसंपादन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. अल्पावधीतच या विभागाने संपूर्ण २६ गावातील जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना बºयापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. तर वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यात एकूण नऊ गावातील जमीन संपादीत करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी तीन गावातील जमीन संपादीत करण्यात आली आहे. शिवाय उर्वरित सहा गावातील जमीन संपादन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. सोमवारी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासनातील भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी बैठक घेवून चर्चा केली. शिवाय काही भूसंपादनाचे प्रकरणांवर सकारात्मक चर्चेअंती तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा-नागपूर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनची प्रक्रिया मोजणीस्तरावरवर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण दहा गावांमध्ये जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. सध्या सदर प्रकल्पाचा विषय मोजणी स्तरावर आहे. लवकरच मोजणी पूर्ण करून जमिनीचे संपादन करीत ही दहा गावांमधील जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.तीन महिन्यांत होईल संपादनाची प्रक्रिया पूर्णरेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी व संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन रेल्वे विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. राज्य शासन ही जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत करणार असून ही संपूर्ण प्रक्रिया येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले.अडचणींवर मात करण्याच्या सूचनासदर चारही प्रकल्पांसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासंदर्भात येणाºया अडचणी तत्काळ दूर कराव्या, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रेल्वे विभाग व जलसंपदा विभागाच्या बैठकीत या सूचना मोजणी विभागाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.वर्धा-नांदेड या नव्या रेल्वे लाईनसाठी २६ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी आतापर्यंत तीन गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तर वर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया मोजणी स्तरावर आहे. यद्धपातळीवर हे काम होत आहे.- चंद्रभान पराते, उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, वर्धा.