शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

राष्ट्रपित्याचे जीवन कार्य जगासाठी दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:47 IST

देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच.

ठळक मुद्देविचारवंत प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी आजही येतात आश्रमात

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच. सत्य व अहिंसेचे व्रत जीवनभर अंगिकारणाºया महात्मा गांधीजींची हत्या विद्वेषीवृत्ती आणि सनातनातून झाली. राष्ट्रपित्याला जावून ७० वर्ष झाली. मात्र त्यांचे विचार, कार्य व तत्व जगासाठी दीपस्तंभ बनले. जगातली विचारवंत प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी आजही त्यांच्या सेवाग्राम आश्रमात येतात.देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय साबरमतीमध्ये परतणार नाही असा संकल्प करून महात्मा गांधी हे दांडी मार्चसाठी आश्रमातून निघाले. तुरूंगवासातून मुक्तता झाल्यानंतर जमनालाल बजाज यांच्या विनंती व आग्रहावरून १९३४ ला वर्धा आणि १९३६ मध्ये सेवाग्रामला वास्तव्य केले. आपली स्वार्थी तृष्णा भागविण्यासाठी जग सारखे धावत आहे. यामध्ये सामान्य व दुबळ्यांचे शोषण केल्या जात आहे. शंभर वर्षापूर्वी महात्मा गांधींनी हे ओळखले. शोषणमुक्त अहिंसक जीवन कसे असू शकते हे सूत्र रस्कीन, टालस्टॉय यांच्या विचारातून हाती आले. सत्य, श्रम, स्वावलंबन, अपरिग्रह या विचारांवर सेवाग्राम आश्रमची स्थापना झाली. स्वातंत्र्य चळवळ, रचनात्मक कार्यक्रम, चारित्र्य संपन्न महापुरूष, नेते, कार्यकर्ता व साधक येथूनच राष्ट्र उभारणीच्या कामी आले.सेवाग्राम आश्रम जगासाठी मॉडेल बनले. साधी राहणी, कमीत कमी गरजा, प्रकृतिच्या सानिध्यातील जीवन कसे जगता येते, हे गांधीजींनी दाखवून दिले. बापूंचा आश्रम नियमावर होता आणि नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक होते. गांधीजींच्या काळातील व्यवस्था व कार्य आजही येथे जोपसल्या जातात. यात प्रार्थना, श्रमदान, कताई, विणकाम आदी असून शेती आणि गोशाळेचीही परंपरा कायम आहे.लाखोंच्या संख्येनी पर्यटक, दर्शनार्थी आणि अभ्यासक आश्रमला भेट देवून जातात. आश्रमातील वातावरण, स्मारकांचा इतिहास आणि बापूंच्या वास्तव्याची भूमी यामुळे एक वेगळीच भावना निर्माण होवून जाते. जगाच्या पाठीवर अहिंसेचे तत्व जीवनभर अंगिकृत करणारे महात्मा सुकरान यांना त्यांच्याच देशातील लोकांनी विष पाजले. महात्मा येशूंना सुळावर चढविले आणि महात्मा गांधीजींना मारण्यासाठी आपल्याच देशातील एकाने हत्याराचा उपयोग केला.बापूंना जावून ७० वर्षे झाली. पण जग आणि जगातील मानवासाठी बापूंच्या विचाराशिवाय पर्याय नाही. देशात जी विध्वसंक स्थिती निर्माण करण्यात आली योच समाधान पण त्यांच्याच तत्वातून सापडेल. जग बापूंच्या विचाराभोवती फिरत असल्याने आश्रमाकडे लोकांचा ओढा वाढल्याचे दिसून येते.