शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपित्याचे जीवन कार्य जगासाठी दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:47 IST

देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच.

ठळक मुद्देविचारवंत प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी आजही येतात आश्रमात

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच. सत्य व अहिंसेचे व्रत जीवनभर अंगिकारणाºया महात्मा गांधीजींची हत्या विद्वेषीवृत्ती आणि सनातनातून झाली. राष्ट्रपित्याला जावून ७० वर्ष झाली. मात्र त्यांचे विचार, कार्य व तत्व जगासाठी दीपस्तंभ बनले. जगातली विचारवंत प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी आजही त्यांच्या सेवाग्राम आश्रमात येतात.देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय साबरमतीमध्ये परतणार नाही असा संकल्प करून महात्मा गांधी हे दांडी मार्चसाठी आश्रमातून निघाले. तुरूंगवासातून मुक्तता झाल्यानंतर जमनालाल बजाज यांच्या विनंती व आग्रहावरून १९३४ ला वर्धा आणि १९३६ मध्ये सेवाग्रामला वास्तव्य केले. आपली स्वार्थी तृष्णा भागविण्यासाठी जग सारखे धावत आहे. यामध्ये सामान्य व दुबळ्यांचे शोषण केल्या जात आहे. शंभर वर्षापूर्वी महात्मा गांधींनी हे ओळखले. शोषणमुक्त अहिंसक जीवन कसे असू शकते हे सूत्र रस्कीन, टालस्टॉय यांच्या विचारातून हाती आले. सत्य, श्रम, स्वावलंबन, अपरिग्रह या विचारांवर सेवाग्राम आश्रमची स्थापना झाली. स्वातंत्र्य चळवळ, रचनात्मक कार्यक्रम, चारित्र्य संपन्न महापुरूष, नेते, कार्यकर्ता व साधक येथूनच राष्ट्र उभारणीच्या कामी आले.सेवाग्राम आश्रम जगासाठी मॉडेल बनले. साधी राहणी, कमीत कमी गरजा, प्रकृतिच्या सानिध्यातील जीवन कसे जगता येते, हे गांधीजींनी दाखवून दिले. बापूंचा आश्रम नियमावर होता आणि नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक होते. गांधीजींच्या काळातील व्यवस्था व कार्य आजही येथे जोपसल्या जातात. यात प्रार्थना, श्रमदान, कताई, विणकाम आदी असून शेती आणि गोशाळेचीही परंपरा कायम आहे.लाखोंच्या संख्येनी पर्यटक, दर्शनार्थी आणि अभ्यासक आश्रमला भेट देवून जातात. आश्रमातील वातावरण, स्मारकांचा इतिहास आणि बापूंच्या वास्तव्याची भूमी यामुळे एक वेगळीच भावना निर्माण होवून जाते. जगाच्या पाठीवर अहिंसेचे तत्व जीवनभर अंगिकृत करणारे महात्मा सुकरान यांना त्यांच्याच देशातील लोकांनी विष पाजले. महात्मा येशूंना सुळावर चढविले आणि महात्मा गांधीजींना मारण्यासाठी आपल्याच देशातील एकाने हत्याराचा उपयोग केला.बापूंना जावून ७० वर्षे झाली. पण जग आणि जगातील मानवासाठी बापूंच्या विचाराशिवाय पर्याय नाही. देशात जी विध्वसंक स्थिती निर्माण करण्यात आली योच समाधान पण त्यांच्याच तत्वातून सापडेल. जग बापूंच्या विचाराभोवती फिरत असल्याने आश्रमाकडे लोकांचा ओढा वाढल्याचे दिसून येते.