शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वनविभागाची लाखोंची संपत्ती वाऱ्यावर

By admin | Updated: July 24, 2016 00:23 IST

खरांगणा वनपरिक्षेत्रात साग वृक्षांचे विस्तीर्ण जंगल आहे. यामुळे चोरीच्या घटनाही होतात.

नाके कुलूपबंद : चोरीच्या घटनांत वाढ आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात साग वृक्षांचे विस्तीर्ण जंगल आहे. यामुळे चोरीच्या घटनाही होतात. यापूर्वी लाखो रुपयांचे सागवान चोरीत एकाला अटकही झाली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळवून सागवान चोरीच्या घटना होऊन काहींवर गुन्हे दाखल झाले होते. ‘लोकमत’ने सदर घटनांचा पाठपुरावा केला होता. चोरीच्या घटना पाहून वनविभागाने शहाणे होत वन नाके सुरू ठेवणे गरजेचे होते; पण बहुतांश नाके कुलूपबंद आढळून आले. वनसंपत्तीची चोरी रोखण्याकरिता वननाके उपयुक्त ठरतात; पण सदर वनपरिक्षेत्रात फेरफटका मारला असता बोरखेडी व खरांगणा नजीकचा वन नाका कुलूपबंद दिसला. यामुळे वनविभागाने चोरट्यांसाठी रान मोकळे केल्याचेच दिसून येते. जंगलाचा फेरफटका मारला असता कुठेही गस्त आढळून आली नाही. लोकमत वृत्तामुळे काही महिन्यांपूर्वी जंगलात तोडून ठेवलेला सागाचा साठा उघड झाला. दबाव वाढताच एकावर फौजदारी कारवाई केली. यात वन कोठडी घेण्यात आली नाही आणि आरोपी व साथीदाराची नावेही घेण्यात आली नाही. दुसऱ्या एका प्रकरणात तर खोटे दस्तावेज तयार करून सागवान तोडण्याचा गैरप्रकार घडला. या प्रकरणात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला. एवढ्या गंभीर घटना उजेडात येऊनही वन नाके २४ तास उघडे ठेवण्याबाबत उदासीनताच दिसते. नाके कुलूपबंद असल्याने बिनबोभाट सागाची ने-आण होत नाही, असे म्हणता येणार नाही. तैनात असलेले नाक्यावरील कर्मचारी कर्तव्य पालन करतात की, गायब राहतात, हे कोण तपासणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. वनरक्षक जंगलात पाय ठेवत नाही. जंगलात काय घडते, याचा मागपुसही त्यांना नसतो. ते घरी वा वनपरिक्षेत्र कार्यालय व सहवनक्षेत्र कार्यालयातच असतात. एखाद्या घोरपड शिकारीची वा सागवान चोरीची घटना केवळ सदर व्यक्ती रस्त्यात भेटल्यास वा विरोधकांनी माहिती दिल्यास उघड होते. शिकारी, चोरी दररोज होत नाही, असा आभास अधिकाऱ्यांपूढे उभा केला जातो. आपल्या बिटात, सहवनक्षेत्रात, वनपरिक्षेत्रात चोरी, शिकार होत नाही, हे दाखविण्यासाठी घटनांवरही पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही दिसते. खरांगणा वन परिक्षेत्रात सुरू असलेल्या या प्रकाराकडे उपवन संरक्षक यांनी जातीने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. शिवाय वन नाके सुरू करून जंगलाच्या संरक्षणासाठी संबंधितांना समज देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)