शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पाण्याच्या टाकीतून लाखो लीटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: March 16, 2017 00:47 IST

पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे.

जीवन प्राधिकरणचा गलभान कारभार : नगराध्यक्षांनी केली संबंधीत विभागाची कानउघाडणी आर्वी : पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे. मात्र जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे येथील पाण्याच्या टाकीतून दिवसाला लाखो लीटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांंनी संबंधीत विभागाची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे. पाण्याचा अपव्यय होत असताना याकडे जीवन प्राधिकरण विभाग लक्ष देण्यास तयार नाही. नागरिकांनी अनेकदा ही बाब लक्षात आणुन दिली. तरीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून आले. दरम्यान नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे हे दररोज सकाळी शहराचा फेरफटका मारतात. या माध्यमातून ते नागरिकांच्या समस्या जाणुन घेतात. शहरात फेरफटका मारत असतात त्यांना जनतानगर येथे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. येथील पाण्याच्या टाकीतून आर्वी शहराला पुरवठा होतो. पाणी टाकी भरल्यावर पाणी पुरवठा सुरूच असतो. हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. सव्वालाखे यांनी आर्वीतील जीवन प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून ही समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी चर्चा केली. तसेच चार वर्षापासून हा प्रकार सुरू असताना उपाययोजना न केल्याने कानउघाडणी केली. जनतानगराच्या येथील पाण्याच्या टाकीची १० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. टाकी भरण्याकरिता तीन तास लागतात, मात्र पाण्याची मोटर सुरुच असते. त्यामुळे उर्वरीत पाणी टाकीतून रस्त्यावर वाहते. तक्रार करुनही संबंधीत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)