शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीतून लाखो लीटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: March 16, 2017 00:47 IST

पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे.

जीवन प्राधिकरणचा गलभान कारभार : नगराध्यक्षांनी केली संबंधीत विभागाची कानउघाडणी आर्वी : पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे. मात्र जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे येथील पाण्याच्या टाकीतून दिवसाला लाखो लीटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांंनी संबंधीत विभागाची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे. पाण्याचा अपव्यय होत असताना याकडे जीवन प्राधिकरण विभाग लक्ष देण्यास तयार नाही. नागरिकांनी अनेकदा ही बाब लक्षात आणुन दिली. तरीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून आले. दरम्यान नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे हे दररोज सकाळी शहराचा फेरफटका मारतात. या माध्यमातून ते नागरिकांच्या समस्या जाणुन घेतात. शहरात फेरफटका मारत असतात त्यांना जनतानगर येथे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. येथील पाण्याच्या टाकीतून आर्वी शहराला पुरवठा होतो. पाणी टाकी भरल्यावर पाणी पुरवठा सुरूच असतो. हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. सव्वालाखे यांनी आर्वीतील जीवन प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून ही समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी चर्चा केली. तसेच चार वर्षापासून हा प्रकार सुरू असताना उपाययोजना न केल्याने कानउघाडणी केली. जनतानगराच्या येथील पाण्याच्या टाकीची १० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. टाकी भरण्याकरिता तीन तास लागतात, मात्र पाण्याची मोटर सुरुच असते. त्यामुळे उर्वरीत पाणी टाकीतून रस्त्यावर वाहते. तक्रार करुनही संबंधीत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)