शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

कापसाच्या उत्पादनात २१ लाख क्विंटलने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:12 IST

यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारीअखेरपर्यंत केवळ १६.७२ लाख क्विंटलची खरेदी

ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे. ही आवक गत वर्षीच्या तुलनेत थोडी थोडकी नाही तर तब्बल २१ लाख क्विंटलने घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.जिल्ह्यात असलेल्या बाजार समितींत आतापर्यंत १६ लाख ७२ हजार ७४० क्विंटल कापसाची आवक झाली आहे. यात खासगी व्यापाºयांची खरेदी १६ लाख ७२ हजार २७६ क्विंटल तर शासनाची ४६४.९६ क्विंटल एवढी असल्याची नोंद झाली आहे. या तुलनेत गत हंगामात वर्धेत व्यापाºयांकडून ३७ लाख ६७ हजार ६१९.७९ क्विंटल तर शासनाकडून ६ हजार ७४.५५ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. दोन्ही हंगामाचा विचार केल्यास जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत २१ लाख ९५३.३८ क्विंटलने आवक घटल्याचे दिसत आहे.यंदाच्या खरीपात कापूस उत्पादकांकडून अडीच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यातच जिल्ह्यात ओलीताचे प्रमाण वाढल्याने कापूस उत्पादक चांगले उत्पन्न होईल, अशी आशा बाळगून होते. मात्र कापूस निघण्याच्या काळात कपाशीवर झालेल्या बोंड अळीच्या हल्ल्याने त्यांच्या आशा, अपेक्षा धुळीस मिळाल्या. यातच शेतकºयांना मदतीचे आश्वासन दिले असून ते केव्हा पूर्णत्त्वास जाते याकडे त्यांच्या नजरा आहेत.उत्पन्न कमी तरी भाव पडलेउत्पन्न कमी असल्यास भाव चढण्याचा आतापर्यंतचा अर्थशास्त्राचा नियम यंदा मात्र खोटा ठरत असल्याचे बाजार समितीच्या चित्रावरून दिसत आहे. कापसाचे उत्पादन कमी झाल्याने बºयापैकी दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र बाजारात आज ४८०० ते ५२०० रुपयांच्या घरातच कापसाला भाव मिळत आहे. किडीच्या प्रादुर्भावमुळे हातचे उत्पादन गेले आणि व्यापाऱ्यांच्या मर्जीमुळे भाव पडले. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.घरचा कापूस संपलाभाव वाढीच्या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी घरी कापूस ठेवला होता. मात्र या कापसामुळे शेतकºयांना आंगावर खाज येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस बाजारात काढला. असे असतानाही फेब्रुवारी अखेरपर्यंत झालेल्या आवकीवरून कापूस उत्पादनात जिल्ह्यात कमालीची घट झाली, असेच दिसत आहे.यंदा शासकीय खरेदीला पाठकापूस उत्पादक शेतकºयांना किमान हमीभावाची तरी हमी असावी याकरिता कापूस पणन महासंघ व कॉटन फेडरेशन इंडिया यांच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यात पणन महासंघाच्या केंद्रांवर मुहुर्तालाही कापूस मिळाला नाही. तर सीसीआयच्या केंद्रांवर ४६४.९६ क्विंटलची आवक झाली आहे.

टॅग्स :cottonकापूस