शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 28, 2014 23:01 IST

गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.

वडनेर : गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वीज वितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे डोळेझाक करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या क्षेत्रात लाईनमनकडे काम अधिक व कर्मचारी कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या तक्रारीचे निरसन रितसर होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. एकाच दिवसातून अनेकदा वारंवार वीज खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारनियमनाच्या वेळा बरोबर नसल्याने कधी रात्री तर कधी दिवसा वीज पुरवठा खंडीत होतो. शेतकरी मात्र आपला जीव टांगणीला लावून रात्री अपरात्री ओलीतासाठी शेतावर जात असतात. अशात एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. भारनियमन वाढत असल्याने खरीपात ओलीत करणे अवघड झाले आहे. आता रबी हंगाम सुरू होत आहे. यात भारनियमनाचा बडगा कायम असल्यास रबीला ओलीत कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रबी पिकांची ओलिताची सोय असून सुध्दा या विजेच्या लंपडावाने शेतकरी त्रस्त असल्याचे बोलत आहे. त्यामुळे यावर्षी रबी पिकांना ही फटका बसण्याचे संकेत आहेत. (वार्ताहर)