शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कामगार कायद्यातील बदल उद्योगहिताचा

By admin | Updated: June 1, 2015 02:21 IST

राज्य शासनाने प्रचलित कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु हा बदल उद्योगपती आणि कारखानदारांच्या हिताचा असल्याचा

सिटूूचे आंदोलन : विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणीवर्धा : राज्य शासनाने प्रचलित कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु हा बदल उद्योगपती आणि कारखानदारांच्या हिताचा असल्याचा आरोप सिटूने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे केला.बहुसंख्य कामगारांकडून किमान वेतन कायदा, कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन कायदा, कारखाने अधिनियम व अन्य कामगार कायदे सर्रास पायदळी तुडविले जात आहेत. महाराष्ट्रात ९५ टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यांना ना किमान वेतन ना महागाई भत्ता मिळतो. विमा व पेन्शनदेखील दिली जात नाही. राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, स्त्री परिचर, ग्राम रोजगार सेवक, आरोग्य मिशनमधील कर्मचारी, पेयजल, डाटा एंट्री आॅपरेटर यापैकी काहींना तुटपुंजे पाच ते दहा हजार रुपये मानधन दरमहा दिले जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कामगारविषयक त्रिपक्षीय समित्या, मंडळे त्वरित गठित करावी, त्यामध्ये केंद्रीय कामगार संघटनांना प्रतिनिधीत्व असावे, अर्थसंकल्पापूर्वी, अर्थसंकल्पानंतर कामगार कायद्यात दुरुस्ती करताना कामगार, उद्योग, महिलाविषयक धोरण ठरविताना कामगार संघटनांशी चर्चा करावी, सर्वच विभागातील रोजंदारी कर्मचारी व ठेकेदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, अंगणवाडीसेविका, आशा, शालेय पोषण आहार, ग्रामरोजगार सेवक, स्त्री परिचर, कर्मचाऱ्यांना कामगाराचा दर्जा देत वेतनश्रेणी लागू करावी, दरमहा किमान १५ हजार वेतन द्यावे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्या - त्या आस्थापनेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन व सवलती द्याव्यात, त्यांना कायम करावे, समान कामाला समान वेतन व सवलती या अंमल करावा, मूळ वेतन दरमहा रुपये १५ हजार करण्यात यावे. त्याव्यतिरिक्त महागाई भत्ता देण्यात यावा यासह १७ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी सिटूचे अध्यक्ष यशवंत झाडे, सीताराम लोहकरे, भय्याजी देशकर, महेश दुबे, प्रमिला घागरे, विनीता धुर्वे, भगत, नलू येलोरे, नागमोते, अग्निहोत्री आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)नव्या कायद्यातील बदल