शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कामगार कायद्यातील बदल उद्योगहिताचा

By admin | Updated: June 1, 2015 02:21 IST

राज्य शासनाने प्रचलित कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु हा बदल उद्योगपती आणि कारखानदारांच्या हिताचा असल्याचा

सिटूूचे आंदोलन : विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणीवर्धा : राज्य शासनाने प्रचलित कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु हा बदल उद्योगपती आणि कारखानदारांच्या हिताचा असल्याचा आरोप सिटूने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे केला.बहुसंख्य कामगारांकडून किमान वेतन कायदा, कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन कायदा, कारखाने अधिनियम व अन्य कामगार कायदे सर्रास पायदळी तुडविले जात आहेत. महाराष्ट्रात ९५ टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यांना ना किमान वेतन ना महागाई भत्ता मिळतो. विमा व पेन्शनदेखील दिली जात नाही. राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, स्त्री परिचर, ग्राम रोजगार सेवक, आरोग्य मिशनमधील कर्मचारी, पेयजल, डाटा एंट्री आॅपरेटर यापैकी काहींना तुटपुंजे पाच ते दहा हजार रुपये मानधन दरमहा दिले जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कामगारविषयक त्रिपक्षीय समित्या, मंडळे त्वरित गठित करावी, त्यामध्ये केंद्रीय कामगार संघटनांना प्रतिनिधीत्व असावे, अर्थसंकल्पापूर्वी, अर्थसंकल्पानंतर कामगार कायद्यात दुरुस्ती करताना कामगार, उद्योग, महिलाविषयक धोरण ठरविताना कामगार संघटनांशी चर्चा करावी, सर्वच विभागातील रोजंदारी कर्मचारी व ठेकेदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, अंगणवाडीसेविका, आशा, शालेय पोषण आहार, ग्रामरोजगार सेवक, स्त्री परिचर, कर्मचाऱ्यांना कामगाराचा दर्जा देत वेतनश्रेणी लागू करावी, दरमहा किमान १५ हजार वेतन द्यावे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्या - त्या आस्थापनेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन व सवलती द्याव्यात, त्यांना कायम करावे, समान कामाला समान वेतन व सवलती या अंमल करावा, मूळ वेतन दरमहा रुपये १५ हजार करण्यात यावे. त्याव्यतिरिक्त महागाई भत्ता देण्यात यावा यासह १७ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी सिटूचे अध्यक्ष यशवंत झाडे, सीताराम लोहकरे, भय्याजी देशकर, महेश दुबे, प्रमिला घागरे, विनीता धुर्वे, भगत, नलू येलोरे, नागमोते, अग्निहोत्री आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)नव्या कायद्यातील बदल