शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

शेतीच्या मशागतीला मजूरच मिळेना

By admin | Updated: June 21, 2014 02:01 IST

गतवर्षी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला. मात्र यंदा वर्षाच्या सुरूवातीला अनियमित पाऊस ...

सेलू : गतवर्षी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला. मात्र यंदा वर्षाच्या सुरूवातीला अनियमित पाऊस आणि प्रलंबित पावसामुळे शेतकरी त्रस्त आहे. यातच मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. याशिवाय मजूर मिळत नसल्याने मशगतीचे कामे खोळंबली आहे.मागील हंगाम पिकांकरिता प्रतिकुल असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षा रब्बी हंगामावर होत्या. परंतु, रब्बी हंगामातील पीक बरहल्यावर नेमकी गारपीट झाली. तोंडाचा घास हिरावला. पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेतकरी खरिपाच्या मशागतीला लागला. मात्र मजूरच्या मिळत नसल्याने आगामी शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मजूरीचे दर वाढल्याने किंबहुना ती रक्कमही शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे घरातील सर्व मुलाबाळासह आपल्या शेतीवर सकाळपासून शेतकरी राबताना दिसून येत आहे. मजुरांच्या मजूरीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. १५० ते ३०० रूपये मजूरीचा दर आहे. यामुळे शेकतकरी त्रस्त आहे. वाढलेली मजूरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी, सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामावर परिणाम होत आहे. आधीच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नसताना खरीपाची तयारी कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.शासनाच्या अंत्योदय व दारिद्रयरेषेखालील घटकांसाठीच्या स्वस्त धान्य योजनेमुळे एका कुटुंबाला महिन्यासाठी ३५ ते ४४ किलो धान्य स्वस्तात मिळत आहे. अतिशय कमी किमतीत धान्य मिळत असल्याने मजूरांनी धान्यासाठी मजुरीच करणे सोडून दिले. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांनी गहू व इतर कडधान्यांचा पेरा कमी केला. त्याऐवजी सोयाबीन व हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही दोन्ही पिके अल्प कालावधीत येतात आणि इतर पिकाच्या तुलनेत कमी मजूर लागतात. निंदणाला पर्याय म्हणून तणनाशकाचा वापर करीत आहे. मात्र याच्या अतिरेकी वापरचा परिणाम थेट जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ मजूर मिळत नसल्याने दुष्परिणामाची माहिती असूनही शेतकऱ्यांकडून तणनाशकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. आज निर्माण झालेल्या वैरणटंचाईमागे मजुरांची समस्याच कारणीभूत आहे. ज्वारीचा पेरा कमी झाला तेव्हापासून वैरणटंचाई निर्माण झाली. गुरे चारण्यासाठी गुराखी मिळत नसल्याने गुरांची संख्या कमी झाली आहे. शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करीत असल्याचे दिसून येते.(तालुका प्रतिनिधी)