शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रजांची कविता वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे जाणारी

By admin | Updated: March 6, 2017 01:08 IST

कुसुमाग्रजांच्या वैविध्यपूर्ण साहित्यातील अनेक ओळी आजही सुभाषितांसारख्या जनजीवनात वापरल्या जातात.

पुरुषोत्तम माळोदे : विदर्भ साहित्य संघाचे कविसंमेलन वर्धा : कुसुमाग्रजांच्या वैविध्यपूर्ण साहित्यातील अनेक ओळी आजही सुभाषितांसारख्या जनजीवनात वापरल्या जातात. त्यांच्या कवितेतील सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की त्यांच्या प्रेमकवितेतही भावनिक चिंतनच दिसून येते. त्यांची कविता ही वैयक्तिकतेकडून वैश्विकतेकडे जाणारी आहे, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी केले. विदर्भ साहित्य संघ शाखेद्वारे घेण्यात आलेल्या कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रारंभी विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडताना मराठी भाषा दिनाबाबतच्या विविध विचारप्रवाहांचा आढावा घेतला. कविसंमेलनात जयश्री कोटगीरवार यांनी माझ्या मराठीचा संग, नित्य गाईल अभंग, नामा तुकोबाची वाणी, डोही आनंद तरंग, अशी मराठीची थोरवी गायली. तर असू तिला अपुल्या मनात, बोली अपुली माय मराठी, शब्द तिचेच बळ देतील, थोर पौष्टिक साय मराठी असे मायबोलीचे गुणगान प्रशांत पनवेलकर यांनी केले. कोण मी आता, हा प्रश्न सारखा पडे, कर्तृत्वातून माझ्या मलाच ओळख माझी सापडे’ अशी स्त्रीजाणिवा जोपासणारी कविता मंजूषा चौगावकर यांनी सादर केली. या शहरात खूप लोक राहतात, असे सांगताना प्रमोद नारायणे म्हणाले, गर्दीने व्यापून गेले आहे हे शहर, खचाखच भरलेल्या कुपीत खुप लोकं राहतात. काळोखात हरवून गेले आहे हे शहर, भयाण भरल्या कुशीत खूप लोक राहतात. मीनल रोहणकर यांनी स्त्रीचे चारित्र्य काचेचं असतं तर पुरुषांचे चारित्र्य काय पोलादी असतं? असा प्रश्न कवितेतून विचारला. तर, स्नेहल कुबडे हिने वाटतं मला शोधां आपणही नवीन काही नवं आकाश, नवे ढग, नवं तेज आणि अजून काही.. असा अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या कवितेतून केला. तर पृथ्वीचे प्रेमगीतही तुम्हीच गायले अमुच्यासाठी, नटसम्राटाच्याही बेघर होण्याच्या दुखाची कथा तुम्हीच ऐकविली. तुमच्याच शब्दांनी शिकवला आम्हाला आशावाद’ अशा शब्दात कल्पना माळोदे यांनी कुसुमाग्रजांचे स्मरण केले. संजय इंगळे तिगावकर यांनी मी पुत्र अमृताचा, ओवी अभंग माझे, छळते कशी कळेना ही गझलियत मलाही, ना मीर ना जफर मी, गालीब ना नाही जरी मी, माझी गझल तिथेही, आहे जिथे इलाही ही गझल सादर केली. या काव्यमैफलीत प्रा. अरविंद पाटील, प्रभाकर उघडे, प्रभाकर पाटील, प्रशांत ढोले, पुरुषोत्तम माळोदे यांनीही कविता सादर केल्या. डॉ. स्मिता वानखेडे व रंजना दाते यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र मुंढे यांचा वि.सा. संघ शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते, प्रा. शेख हाशम, प्रा. पद्माकर बावीस्कर, प्रा. किशोर वानखेडे, संगीता इंगळे, शुभा भिडे, रमेश बोधनकर, राजेश इंगळे यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी) मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज- देशमुखवर्धा : भाषा ही संवाद व्यवहाराचे माध्यम आहे. पृथ्वीवरील संपन्न व समर्थ भाषापैकी मराठी ही एक भाषा आहे. तिची प्राचीन काव्यसंपदा व गद्यसंपदा अलौकिक आहे. हेच तिच्या श्रीमंतीचे प्रधान कारण आहे. तसेच तिचे व्यवहरक्षेत्रही व्यापक आहे. मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे, असे मत प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी व्यक्त केले.स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे मराठी विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या वतीने आयोज्जित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. खोडे होते. जगात मराठी बोलणाऱ्यांची संख्या अकरा लाख आहेत. या दृष्टिकोनातून विचार केल्यास जागतिक क्रमवारित मराठीचा एकोणविसावा क्रमांक लागतो. पटकथा लेखन, मोडीलिपी, गीत रचना, दुभाषी, शुद्धलेखन तपासणे, वृत्तपत्र, दुरदर्शन, अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी आहे, असे डॉ. खोडे यांनी सांगितले. प्रा. उमा खनाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.