शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

कोतवाल वेतन श्रेणीपासून बेदखल

By admin | Updated: September 2, 2016 02:05 IST

शासनाच्या योजना राबविण्याकरिता व त्याची माहिती सर्वसमान्यांना देण्याकरिता शासनानेच कोतवालपद निर्माण केले.

वृद्ध कोतवालांचे बेहाल : चार वर्षांपासूनच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्षपुरुषोत्तम नागपुरे  वर्धाशासनाच्या योजना राबविण्याकरिता व त्याची माहिती सर्वसमान्यांना देण्याकरिता शासनानेच कोतवालपद निर्माण केले. या पदाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे आर्वी तालुक्यातील ३३ कोतवाल अद्यापही वेतन श्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोतवालांचे आंदोलन चार वर्षांपासून सुरू असून त्याची शासनाने दखल घेतली नाही. या संदर्भात अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले, पण ते मंत्रिमंडळात नामंजूर करण्यात आले.१९ जुलै २००१ च्या शासन परिपत्रकानुसार पाच वर्षे सेवा झालेल्या व ४५ वर्षांच्या आत असलेल्या कोतवालांना वर्ग चारमध्ये नियुक्ती देत शासकीय सोयीसवलती देण्याची तरतूद आहे; परंतु सेवा ज्येष्ठ कोतवालांना यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. पूर्वी विशिष्ट समाजातील तरुण कोतवालाची नोकरी करीत होते; मात्र आता कोतवालाची नोकरी करण्यासाठी सध्याच्या बेरोजगाराीमुळे सर्व समाजातील तरुण अर्ज करतात. त्यादृष्टीने सोयी सवलती आवश्यक आहेत. वयाच्या साठीपर्यंत सेवा देवून त्यांच्या गाठीला काहीच शिल्लक नसल्याने महसूल विभागातील वयोवृद्ध कोतवालांना हलाखीचे जीवन जगावे लागते. चतुर्थ श्रेणीचा दर्जा नसलेल्या कोतवालाला ५५ वर्षांपासून शासनाने वर्गीकृत न करता अवर्गीकृत ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती वेतन, मोबदला किंवा एकरकमी रक्कम आदी मिळत नाही. जीव धोक्यात घालून सेवा करणारे कोतवाल आयुष्याच्या शेवटी निराधार होतात. प्रसंगी एखाद्या उपहारगृहात कपबश्या धुतात. कुणाच्या कारखान्यात अथवा शेतावर रखवाली करून उरनिर्वाह करीत असल्याचे चित्र आहे.आता एका साझ्याला एक कोतवाल आहे. शासनाच्या धोरणात कोतवालांकरिता काहीच नाही शासनाच्या धोरणामुळे कोतवाल दुर्लक्षीत झाला आहे. पर्यायाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. देशातील गुजरात व त्रिपूरा राज्यात मात्र कोतवालांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता आहे. राज्याच्या स्थापनेपासून त्यांना केवळ आश्वासन, वचन व शब्द देण्यातच सत्ताधाऱ्यांनी खेळी केली आहे. महागाईच्या काळात अत्यल्प मानधनात कोतवाल कुटुंबाचे शिक्षण व पालन पोषण योग्य रितीने करू शकत नाही.ग्रामीण भागात तलाठ्यांना सर्व कामास मदत करणारा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात संपूर्ण माहिती शासनास देणारा, कर वसुलीत सहकार्य करणारा, शासकीय आदेशांना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविणारा, २४ तास सेवेत राहणारा, कोतवाल ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकापर्यंत धावपळ करतो. पण त्याच्या वाट्याला अखेरच्या क्षणी काहीच येत नाही. याची दखल शासनाले घेणे गरजेचे झाले आहे.