शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गारपीटग्रस्तांच्या यादीतून खरसखांडाचे शेतकरी बेपत्ता

By admin | Updated: June 28, 2014 23:44 IST

तालुक्यातील खरसखांडा या गावात फेब्रुवारी व मार्च दरम्यान वादळी पावसासह गारपीट झाले़ शेतातील सोयाबिन, संत्रा, गहू, चणा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले; पण येथील एकाही शेतकऱ्याचे

कारंजा (घा़) : तालुक्यातील खरसखांडा या गावात फेब्रुवारी व मार्च दरम्यान वादळी पावसासह गारपीट झाले़ शेतातील सोयाबिन, संत्रा, गहू, चणा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले; पण येथील एकाही शेतकऱ्याचे नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव नाही़ यामुळे शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले़ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़गारपीटग्रस्तांची यादी तयार करताना दुजाभाव करण्यात आला़ यामुळे पुन्हा चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खरसखांडा येथील शेतकरी करीत आहे़ अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच विकास नासरे व ग्रामस्थांनी तहसीलदार बालपांडे यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे़ अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबिन पिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण झाले; पण तहसील कार्यालयामार्फत अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही़ शासनाने लाखो रुपये वाटले; पण खरसखांड्याच्या एकाही शेतकऱ्याच्या खात्यांत अद्याप एक रुपयाही जमा झाला नाही. गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तालुका कृषी कार्यालयाद्वारे करून अहवाल द्यायचा होता. कृषी सेवक मख यांनी पाहणी करून अहवाल संबंधित तलाठ्याकडे दिला; पण तलाठ्याने दिलेला अहवाल गायब झाल्याची माहिती आहे. निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले व शेतकरी मदतीपासून वंचित राहिला़मागील वर्षी नापिकी झाली़ उत्पादन कमी झाले. शेतमालाला भाव मिळाला नाही़ यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे़ नुकसान भरपाईच्या रकमेतून बी-बियाणे घेऊ, अशी आशा होती; पण तहसील कार्यालय व कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले़ यामुळे आता पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)