शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

शेतकऱ्यांसमोर खरीप नियोजनाचे संकट

By admin | Updated: April 30, 2015 02:00 IST

तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान

सुरेंद्र डाफ आर्वीतीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. गत वर्षीचा दुष्काळ नापिकी व अपेक्षित उत्पादनाने शेतकऱ्यांना दिलेली हुलकावणी या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे.गत वर्षीच्या खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे कोसळलेले नैसर्गिक संकट व ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस आदी शेतमालाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. सप्टेंबर ते नोव्हेंबर १४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे नुकसान झाले. यात गारप्पिटीने व खरडलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई देण्यात आली; मात्र यातही गोंधळ होऊन अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही शासनाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. येणाऱ्या हंगामाची तयारी करण्याकरिता शेतकऱ्यांची आर्थिक सोय नाही. शिवाय बँकेकडून कर्ज देण्यासही टाळाटाळ होत आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून येणारा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.