शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतकऱ्यांसमोर खरीप नियोजनाचे संकट

By admin | Updated: April 30, 2015 02:00 IST

तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान

सुरेंद्र डाफ आर्वीतीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. गत वर्षीचा दुष्काळ नापिकी व अपेक्षित उत्पादनाने शेतकऱ्यांना दिलेली हुलकावणी या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे.गत वर्षीच्या खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे कोसळलेले नैसर्गिक संकट व ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस आदी शेतमालाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. सप्टेंबर ते नोव्हेंबर १४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे नुकसान झाले. यात गारप्पिटीने व खरडलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई देण्यात आली; मात्र यातही गोंधळ होऊन अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही शासनाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. येणाऱ्या हंगामाची तयारी करण्याकरिता शेतकऱ्यांची आर्थिक सोय नाही. शिवाय बँकेकडून कर्ज देण्यासही टाळाटाळ होत आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून येणारा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.