शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

शेतकऱ्यांसमोर खरीप नियोजनाचे संकट

By admin | Updated: April 30, 2015 02:00 IST

तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान

सुरेंद्र डाफ आर्वीतीन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नापिकी, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. गत वर्षीचा दुष्काळ नापिकी व अपेक्षित उत्पादनाने शेतकऱ्यांना दिलेली हुलकावणी या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे.गत वर्षीच्या खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे कोसळलेले नैसर्गिक संकट व ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस आदी शेतमालाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. सप्टेंबर ते नोव्हेंबर १४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे नुकसान झाले. यात गारप्पिटीने व खरडलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई देण्यात आली; मात्र यातही गोंधळ होऊन अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही शासनाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. येणाऱ्या हंगामाची तयारी करण्याकरिता शेतकऱ्यांची आर्थिक सोय नाही. शिवाय बँकेकडून कर्ज देण्यासही टाळाटाळ होत आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून येणारा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.