शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

यंदा ४.१८ लाख हेक्टरवर खरीप

By admin | Updated: April 25, 2017 00:55 IST

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे.

६३ हजार ५७५ क्विंटल बियाणे तर ७३ हजार ४०० मे.ट. खताची गरज वर्धा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे. यात कापूस २ लाख २२ हजार हेक्टर, सोयाबीन १ लाख ९ हजार २५० हेक्टर, तूर ७७ हजार ७०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. गत वर्षीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र ६ हजार ७०० हेक्टरने वाढणार असून सोयाबीन पिकाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारीच्या पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना सभाध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी दिल्यात. विकास भवन येथे खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आ. रणजीत काबंळे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती रिता गजाम, सोनाली गरडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी खळीकर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे उपस्थित होते.या खरीपाकरिता ६३ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केली असून २४ हजार ४६२ क्विंटल बियाणे महाबीज कडून तर ३९ हजार ११४ क्विंटल बियाणे इतर कंपन्या पुरविणार आहे. तसेच ७३ हजार ४०० मेट्रीक टन खताची गरज आहे. जिल्ह्यात ठिंबक सिंचनाचा वापर वाढत असल्यामुळे ठिंबक संचामधून देता येतील, अशी विद्राव्य खते कृषी केंद्रामध्ये उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना आ. कुणावार यांनी दिल्या.बँक अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार वर्धा : खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये पीक कर्जाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच इतर बँकाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. तसेच पीक कर्जाचे वितरण करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन नियोजन करावे.(प्रतिनिधी) ३० मे पूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचनाखरीप हंगाम २०१७-१८ साठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्यासोबतच बँकांनी ३० मे पूर्वी ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरीत करावे, अशा सूचना खरीप हंगाम आढावा बैठकीचे अध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी केल्यात. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली.सरकारी कंपन्यांवर कारवाईभूईमुगांच्या प्रात्याक्षिकासाठी शेतकऱ्यांना नॅशनल सिड्स कॉर्पोरेशनने पुरविलेले बियाणे बोगस निघाले यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे प्रकरण खासगी कंपन्याबाबत घडले असते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तोच नियम सरकारी कंपन्यांना लागू करून त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या आहेत.