शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड

By admin | Updated: July 15, 2015 02:43 IST

पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभी काही दिवस चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी आटोपती घेतली; पण गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

दुबार पेरणीचे संकट : कोरडवाहूतील पिकांना शेतकरी देताहेत पिंप, गुंडांनी पाणी; स्प्रिंकलरच्या मागणीत वाढवर्धा : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभी काही दिवस चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी आटोपती घेतली; पण गत २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी स्प्रिंकलर व ड्रीपच्या साह्याने पिकांना जगवत आहे; पण कोरडवाहु शेती असलेल्या शेतकऱ्यांना पिकांना वाचविण्याकरिता मजुरांकडून गुंड, पिंप व अन्य भांड्यांनी पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. पाऊस न आल्यास जिल्ह्यातील अर्ध्याधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यापासून थांबलेला पाऊस अद्याप सुरू झाला नाही. यामुळे ओलिताची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना पिकांना जगविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. वर्धा तालुक्यातील अनेक गावांत पिकांना मजुरांकडून पाणी देऊन जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सिंचनाच्या सुविधा वाढत असल्या, विविध योजना असल्या तरी जिल्ह्यात कोरडवाहु क्षेत्रच अधिक असल्याचे कृषी विभागाचे आकडे सांगतात. यामुळे अर्ध्याधिक शेतकऱ्यांना पिके जगविण्याची केविलवाणी धडपड करावी लागत आहे. काही भागात मजुरांकडून तर कुठे शेतकरी स्वत: कुटुंबीयांसह पिके जगविण्याची धडपड करताना दिसतात. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिच्छा महावितरणचे भारनियमन करीत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने ओलित करणे कठीण झाले आहे. रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन ओलित करावे लागत असल्याचे दिसते. पावसाने दडी मारल्याने उन्हामुळे कपाशी, सोयाबीन पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे बहुतांश शेतकरी मजूर लावून डब्याने झाडांना पाणी देताना दिसतात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत चालले आहे. एक-दोन दिवसांत पाऊस न आल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. काही भागात तर शेतकऱ्यांना पुन्हा नांगर फिरवून पेरणीची तयारी करावी लागत असल्याचे दिसते. पाऊस नसल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, मुंग, ज्वारी आदी पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. गत २० ते २५ दिवसांंपासून पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेती करणारा शेतकरी देशोधडीला लागला आहे. सर्व शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रात्रं-दिवस स्प्रिंकलरच्या साह्याने ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. यात भारनियमन आड येत असल्याने शेतकऱ्यांना ते करणेही कठीण झाल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यात ९९ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या. पावसापूर्वी पेरणी केलेले पीक बऱ्यापैकी असले तरी सर्वच पिकांना दमदार पावसाची गरज आहे. अन्यथा पावसाने मारलेली दडी शेतकऱ्यांना दुबार पेरणीची नांदी ठरण्याची दाट शक्यता आहे.(कार्यालय प्रतिनिधी)