शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
2
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
3
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
4
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
5
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
6
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
7
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
8
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
9
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
10
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
11
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
12
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
13
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
14
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
15
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
16
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
17
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
18
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
19
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
20
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं

जागा मिळेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा

By admin | Updated: September 29, 2016 00:48 IST

बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : हॉकर्स किरकोळ फुटपाथ विक्रेत्यांचे साकडेवर्धा : बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला. पर्यायी जागाही मिळाली नसल्याने व्यवसाय बंद आहे. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. बुधवारी बजाज चौकातून मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य बाजार लाईन, गोल बाजार, अंबिका चौक, बसस्थानक, बजाज चौक, आर्वी नाका, इंगोले, चौक, शिवाजी पुतळा चौक, पत्रावळी चौक येथील फुटपाथवर फळ, भाजी, होजीयरी, चहा, पानठेले, अल्पोपहार, हार-फुल विक्रेते आदींचे व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांना पालिकेने रस्त्याच्या कडेला बंड्या वा दुकाने लावण्यास मनाई केली आहे. परिणामी, या किरकोळ व्यापाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. बाजार लाईन परिसरातच जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बुधवारी बजाज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. हा मोर्चा न्यायालयाजवळ अडविण्यात आला. यानंतर भास्कर इथापे, विजय आगलावे, रवींद्र शाहु, प्रमोद भोमले, मंगेश शेंडे, हबीब यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन सादर केले. चर्चेत जिल्हाधिकारी व न.प. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेनंतर तोडगा काढला जाईल, असे सांगितले.मोर्चामध्ये विनोद वानखेडे, अहमद खा पठाण, प्रवीण कांबळे, इद्रीस खा पठाण, नुर खा पठाण, कांचन खेकडे, रूस्तम, अंतकला नगराळे, अय्याज, सलमान, राजू वैद्य, अनिल जवादे, निजाम, छमू, इमरान, रिजवान कुरेशी, जगदीश शिरभाते, पंढरी खेकडे, मंदा गेडाम मुन्ना बेग, विजू वैद्य, हमिदाबाई, मनोहर निमजे, गुलाब, संदीप सावरकर, कमलेश छकोले, अरविंद वैद्य, अकिल, अर्षद यासह फुटपाथ विक्रेते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)बाजारातील रस्ते झाले मोकळेशहराच्या बाजारओळीतील अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले आहेत. कित्येक दिवसांपासून निमूळते झालेले रस्ते मोकळे दिसत आहेत. बाजारातील प्रत्येक दुकानासमोर हातगाड्या, लहान दुकाने लागत असल्याने ती रस्त्यावर येतात. परिणामी, ग्राहक तसेच दुकानदारांना वाहने ठेवण्यासाठीही जागा राहत नाही. यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण विक्रेत्यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे.उदरनिर्वाहाचा प्रश्न झाला गंभीरशहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य वस्तू विक्रेत्यांचे रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला, बाजारओळीत दुकानांसमोर बसून व्यवसाय करणारे हे नागरिक दररोजच्या मिळकतीवर कुटुंबाचे पालनपोषण करतात. पर्यायी जागा देण्याबाबतचे सर्वेक्षण पालिका प्रशासनाने केले. असे असले तरी या प्रक्रियेला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. इतके दिवस दुकान बंद ठेवून हे विक्रेते कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाही. यामुळे किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.