शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जागा मिळेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा

By admin | Updated: September 29, 2016 00:48 IST

बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : हॉकर्स किरकोळ फुटपाथ विक्रेत्यांचे साकडेवर्धा : बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला. पर्यायी जागाही मिळाली नसल्याने व्यवसाय बंद आहे. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. बुधवारी बजाज चौकातून मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य बाजार लाईन, गोल बाजार, अंबिका चौक, बसस्थानक, बजाज चौक, आर्वी नाका, इंगोले, चौक, शिवाजी पुतळा चौक, पत्रावळी चौक येथील फुटपाथवर फळ, भाजी, होजीयरी, चहा, पानठेले, अल्पोपहार, हार-फुल विक्रेते आदींचे व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांना पालिकेने रस्त्याच्या कडेला बंड्या वा दुकाने लावण्यास मनाई केली आहे. परिणामी, या किरकोळ व्यापाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. बाजार लाईन परिसरातच जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बुधवारी बजाज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. हा मोर्चा न्यायालयाजवळ अडविण्यात आला. यानंतर भास्कर इथापे, विजय आगलावे, रवींद्र शाहु, प्रमोद भोमले, मंगेश शेंडे, हबीब यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन सादर केले. चर्चेत जिल्हाधिकारी व न.प. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेनंतर तोडगा काढला जाईल, असे सांगितले.मोर्चामध्ये विनोद वानखेडे, अहमद खा पठाण, प्रवीण कांबळे, इद्रीस खा पठाण, नुर खा पठाण, कांचन खेकडे, रूस्तम, अंतकला नगराळे, अय्याज, सलमान, राजू वैद्य, अनिल जवादे, निजाम, छमू, इमरान, रिजवान कुरेशी, जगदीश शिरभाते, पंढरी खेकडे, मंदा गेडाम मुन्ना बेग, विजू वैद्य, हमिदाबाई, मनोहर निमजे, गुलाब, संदीप सावरकर, कमलेश छकोले, अरविंद वैद्य, अकिल, अर्षद यासह फुटपाथ विक्रेते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)बाजारातील रस्ते झाले मोकळेशहराच्या बाजारओळीतील अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले आहेत. कित्येक दिवसांपासून निमूळते झालेले रस्ते मोकळे दिसत आहेत. बाजारातील प्रत्येक दुकानासमोर हातगाड्या, लहान दुकाने लागत असल्याने ती रस्त्यावर येतात. परिणामी, ग्राहक तसेच दुकानदारांना वाहने ठेवण्यासाठीही जागा राहत नाही. यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण विक्रेत्यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे.उदरनिर्वाहाचा प्रश्न झाला गंभीरशहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य वस्तू विक्रेत्यांचे रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला, बाजारओळीत दुकानांसमोर बसून व्यवसाय करणारे हे नागरिक दररोजच्या मिळकतीवर कुटुंबाचे पालनपोषण करतात. पर्यायी जागा देण्याबाबतचे सर्वेक्षण पालिका प्रशासनाने केले. असे असले तरी या प्रक्रियेला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. इतके दिवस दुकान बंद ठेवून हे विक्रेते कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाही. यामुळे किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.