शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कॉटन मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:54 IST

गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिनिंग प्रेसिंग मालक व व्यवस्थापकांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्र्व जिनिंग व प्रेसिंग मिलचे मालक, व्यवस्थापक यांची बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, पडलेल्या सरकीपासून झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून कोणत्याही ठिकाणी सरकीपासून झाड उगवू देऊ नका. पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मिटर अंतरावर एक कामगंध सापळा याप्रमाणे सगळीकडे कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये सापडणाºया पतंगाची गणना करून तालुका कृषी अधिकाºयांना कळवावे. ठिकठिकाणी प्रकाश सापळे संध्याकाळी ६ ते ११ च्या कालावधीत लावून जास्तीत जास्त पतंग किटक जमा होतील, अशी व्यवस्था करावी. या सर्व बाबींवर कार्यवाही न करणाºया मिलधारकांवर फौजदारी कलम १३३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पर्यावरणास धोका निर्माण करणे याबाबींतर्गत पर्यावरण कायद्याच्या आधारे परवाना रद्द करण्याबाबत संबंधीत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. सर्व मिलधारकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांच्या २ कि.मी परिसरातील शेतकºयांना किंवा एक हजार शेतकºयांना मोफत कामगंध सापळे व दोन ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी त्यांच्या परिसरातील दोन हजार शेतकºयांना कामगंध सापळे व ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.हिंगणघाटात सर्वाधिक खरेदीबोंडअळीच्या प्रकोपानंतरही हिंगणघाट बाजार समितींतर्गत सर्वाधिक कापसाची खरेदी जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे हिंगणघाट, आर्वी, देवळी, वर्धा, सेलू येथील जिनिंग प्रेसिंग कंपनीसह जिल्ह्याच्या विविध भागातील मिल मालकांना जिल्हाधिकाºयांनी बैठकीतून प्रकोप वाढू नये यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यावसायिकांनीही बाजू मांडली.