शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

कस्तुरबा संस्कृतीच्या प्रतिक होत्या

By admin | Updated: February 23, 2017 00:47 IST

गांधीजी कस्तुरबांना ‘बा’ तर बा गांधीजींना बापू या नावाने संबोधित होत्या. वास्तविक यात सामाजिक ब्रह्मचर्याचे मुल्य दडलेले आहे.

न्या. धर्माधिकारी : कस्तुरबा स्मृतिदिनानिमित्त ‘मातृदिन’ कार्यक्रम सेवाग्राम : गांधीजी कस्तुरबांना ‘बा’ तर बा गांधीजींना बापू या नावाने संबोधित होत्या. वास्तविक यात सामाजिक ब्रह्मचर्याचे मुल्य दडलेले आहे. यात कुठलाही सधर्म नव्हता. बा आश्रमात राहत होत्या; पण खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटीत संस्कृतीचे दर्शन होत होते. संस्कृतीच्या त्या प्रतिक होत्या, असे मत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. नई तालीम समितीच्या शांती भवनमध्ये ‘मातृदिन’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, चतुरा बहन, नफीसा आदी उपस्थित होते. मान्यवरांनी बा व बापू यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केल्यानंतर सूतमाळ व खादी शॉल देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. न्या. धर्माधिकारी पूढे म्हणाले की, बा या बापूंच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनातच नव्हे तर विचार परिवर्तनाच्या लढाईत लढल्या. यातून समानतेचे मूल्य दोघांनीही रूजविले. बा पत्नी असल्या तरी त्या सहभागीनी होत्या. बा नसत्या तर गांधी नसते, हे समजावून घेतले पाहिजे. देशातच नव्हे तर जगात गांधीजींचे पुतळे उभारण्यात आले. काही ठिकाणी दोघांचेही आहे; पण यातून बा चे स्वतंत्र अस्तित्व दिसत नाही. गांधी १५० साजरा करायचा असेल तर माणूस आणि संस्थांनी समर्पण व एकमेकांना सोबत घेवूनच काम केले पाहिजे. राजकारण सत्तेत असते, संस्थांमध्ये नसावे. वर्धेतील संस्थांचे फेडरेशन व्हावे. ताळमेळ ठेवून कार्य करावे आणि न्यायालय मुक्त संस्था असाव्या, अशी भावना व्यक्त केली. युवकांनी खादीचे दोन वस्त्र शिवावे प्रत्येक युवकाने खादीचे दोन वस्त्र शिवावे. यातून एक कोटी लोकांना रोजगार मिळेल. महिला व बालकांचे शोषण होणार नाही. लग्नात हुंडा देऊ आणि घेऊ नका. मुलीचे कन्यादान करू नका, ती वस्तु नाही. गांधीजींनी चरखा, प्रार्थना व पूजा दिली. याचा खरा अर्थ समजावून घ्या. स्वत:चा मार्ग निवडून यशस्वी व्हा. जीवनात श्रमाला महत्त्व द्या. गांधी विचार व खादी वस्त्राचा संकल्प करा, असे आवाहनही न्या. धर्माधिकारी यांनी केले.