शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कस्तुरबा महिलाच नव्हे तर पुरूषांसाठी आदर्श आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:16 IST

कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते.

ठळक मुद्देराधाबहन भट : महात्मा गांधी आश्रमात कस्तुरबा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते. आताचा समाज संकुचित झाला आहे. मनाची प्रगल्भता वाढविणे गरजेचे झाले आहे. बा या महिलाच नव्हे तर पुरूषांसाठीही आदर्शवतच आहेत, असे मत लक्ष्मी आश्रम कौसाजीच्या राधाबहन भट यांनी व्यक्त केले.सेवाग्राम आश्रम परिसरात सभास्थळी गुरूवारी कस्तुरबांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही तर प्रमुख वक्ता म्हणून राधाबहन भट, उषा बहन, नीता विद्रोही, उषा पंडित उपस्थित होत्या. उपस्थितांनी बा च्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करून अभिवादन केले.राधाबहन पूढे म्हणाल्या की, बापू बा मध्ये सामावलेले होते. दोघेही एकमेकांत सामावले असले तरी कस्तुरबांचे स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते, हे विसरता येत नाही. बा एकदा आजारी पडल्या. त्यांनी दूध न घेण्याचे ठरविले; पण डॉक्टर व गांधीजींनी दूध घेण्याचा आग्रह केला. त्यांनी मात्र दूध घेतले नाही. यावरून कस्तुरबांचा व्रत पालनाचा निर्धार दिसून येतो.उषा बहन यांनी आज कस्तुरबाजींची पुण्यतिथी असून बा च्या निधनानंतर गांधीजींनी कस्तुरबा ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टचा उद्देश महिला, मुली व मुलांना सक्षम बनविणे आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान दिले आहे, असे सांगितले. कस्तुरबा माझी सहधर्मिनी, सहकारी व गुरू असल्याचे गांधीजींनी म्हटले. एकदा सरोजिनी नायडू यांनी बापूंना विचारले, जगातील सुंदर स्त्री कोण. त्यांनी लगेच उत्तर दिले ‘कस्तुरबा’. ही बाब नायडूंनी बाला सांगितली. त्या म्हणाल्या खरे आहे. बापू खोटे कधीच बोलत नाही, अशी उदाहरणे व माहिती पंडित यांनी देऊन त्यांचे महत्त्व सांगितले. महादेव विद्रोही यांनी दोन प्रसंग सांगून महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनात व्रत व नियमांचे किती महत्त्व होते, हे पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन आशा ब्रोथ्रा यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश पंकज यांनी मानले.घंटा घर ते बापू कुटी प्रभात फेरीकस्तुरबा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथी निमित्त घंटा घर ते बापू कुटी अशी रामधून गान, प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर प्रार्थना झाली. प्रार्थना भूमिवर सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुत्रयज्ञ झाले. रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत बापूकुटीमध्ये सर्वधर्म भजने झालीत. या कार्यक्रमात जयवंत मठकर, डॉ. श्रीराम जाधव, ठाकूर, प्रसाद, राधाबहन भट तथा आश्रमातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.