शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरबा महिलाच नव्हे तर पुरूषांसाठी आदर्श आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:16 IST

कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते.

ठळक मुद्देराधाबहन भट : महात्मा गांधी आश्रमात कस्तुरबा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते. आताचा समाज संकुचित झाला आहे. मनाची प्रगल्भता वाढविणे गरजेचे झाले आहे. बा या महिलाच नव्हे तर पुरूषांसाठीही आदर्शवतच आहेत, असे मत लक्ष्मी आश्रम कौसाजीच्या राधाबहन भट यांनी व्यक्त केले.सेवाग्राम आश्रम परिसरात सभास्थळी गुरूवारी कस्तुरबांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही तर प्रमुख वक्ता म्हणून राधाबहन भट, उषा बहन, नीता विद्रोही, उषा पंडित उपस्थित होत्या. उपस्थितांनी बा च्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करून अभिवादन केले.राधाबहन पूढे म्हणाल्या की, बापू बा मध्ये सामावलेले होते. दोघेही एकमेकांत सामावले असले तरी कस्तुरबांचे स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते, हे विसरता येत नाही. बा एकदा आजारी पडल्या. त्यांनी दूध न घेण्याचे ठरविले; पण डॉक्टर व गांधीजींनी दूध घेण्याचा आग्रह केला. त्यांनी मात्र दूध घेतले नाही. यावरून कस्तुरबांचा व्रत पालनाचा निर्धार दिसून येतो.उषा बहन यांनी आज कस्तुरबाजींची पुण्यतिथी असून बा च्या निधनानंतर गांधीजींनी कस्तुरबा ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टचा उद्देश महिला, मुली व मुलांना सक्षम बनविणे आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान दिले आहे, असे सांगितले. कस्तुरबा माझी सहधर्मिनी, सहकारी व गुरू असल्याचे गांधीजींनी म्हटले. एकदा सरोजिनी नायडू यांनी बापूंना विचारले, जगातील सुंदर स्त्री कोण. त्यांनी लगेच उत्तर दिले ‘कस्तुरबा’. ही बाब नायडूंनी बाला सांगितली. त्या म्हणाल्या खरे आहे. बापू खोटे कधीच बोलत नाही, अशी उदाहरणे व माहिती पंडित यांनी देऊन त्यांचे महत्त्व सांगितले. महादेव विद्रोही यांनी दोन प्रसंग सांगून महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनात व्रत व नियमांचे किती महत्त्व होते, हे पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन आशा ब्रोथ्रा यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश पंकज यांनी मानले.घंटा घर ते बापू कुटी प्रभात फेरीकस्तुरबा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथी निमित्त घंटा घर ते बापू कुटी अशी रामधून गान, प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर प्रार्थना झाली. प्रार्थना भूमिवर सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुत्रयज्ञ झाले. रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत बापूकुटीमध्ये सर्वधर्म भजने झालीत. या कार्यक्रमात जयवंत मठकर, डॉ. श्रीराम जाधव, ठाकूर, प्रसाद, राधाबहन भट तथा आश्रमातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.