शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर

By admin | Updated: November 28, 2015 03:09 IST

येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

खासदारांकडून धम्मराजिक महाविहाराला २० लाखांच्या मदतीची घोषणा : सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी केळझर : येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जि. प. सदस्य विरेंद रणनवरे, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फारूख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या धम्मराजिक महाविहाराचे सचिव इंजिनिअर पी.एस. खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेतून धम्मभूमित राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यासोबतच तेथील भौतिक सोयीसुविधांच्या उणीवाबाबतही उपस्थितांना अवगत केले.खा. तडस आपल्या अतिथी भाषणात म्हणाले, घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. बाबासाहेब नसते तर आज मी आपल्या समोर नसतो. संविधान दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपल्या भावना खा. तडस यांनी प्रकट केल्या. तसेच २०१५-१६ व १६-१७ या दोन वर्षात या धम्मराजिक महाविहाराला त्यांच्या निधीतून वीस लाख रूपये देण्याची घोषणा केली.तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ध्वजारोहनाने करण्यात आली. तसेच समापन, धम्मवंदना, भोजनदान आदी कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थविर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. धम्मदेसना कार्यक्रमाला भदंत संघसेना, लेह (लद्दाख) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे आर. डी. जोगंदड, सीबीआय नागपूरचे डीआयजी संदीप तामगाडगे, विक्रीकर विभागाचे प्रशांत रोकडे यांची यावेळी व्याख्याने झालीत. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आणि भीम व बुद्धगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाला. भाविकांचा जनसागर रात्रीही कायम होता. संचालन पी. एस. खोब्रागडे व राजेंद्र फुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध सेवा संघ, श्रामनेर सत्यानंद स्मारक समिती व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)