शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर

By admin | Updated: November 28, 2015 03:09 IST

येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

खासदारांकडून धम्मराजिक महाविहाराला २० लाखांच्या मदतीची घोषणा : सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी केळझर : येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जि. प. सदस्य विरेंद रणनवरे, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फारूख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या धम्मराजिक महाविहाराचे सचिव इंजिनिअर पी.एस. खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेतून धम्मभूमित राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यासोबतच तेथील भौतिक सोयीसुविधांच्या उणीवाबाबतही उपस्थितांना अवगत केले.खा. तडस आपल्या अतिथी भाषणात म्हणाले, घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. बाबासाहेब नसते तर आज मी आपल्या समोर नसतो. संविधान दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपल्या भावना खा. तडस यांनी प्रकट केल्या. तसेच २०१५-१६ व १६-१७ या दोन वर्षात या धम्मराजिक महाविहाराला त्यांच्या निधीतून वीस लाख रूपये देण्याची घोषणा केली.तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ध्वजारोहनाने करण्यात आली. तसेच समापन, धम्मवंदना, भोजनदान आदी कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थविर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. धम्मदेसना कार्यक्रमाला भदंत संघसेना, लेह (लद्दाख) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे आर. डी. जोगंदड, सीबीआय नागपूरचे डीआयजी संदीप तामगाडगे, विक्रीकर विभागाचे प्रशांत रोकडे यांची यावेळी व्याख्याने झालीत. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आणि भीम व बुद्धगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाला. भाविकांचा जनसागर रात्रीही कायम होता. संचालन पी. एस. खोब्रागडे व राजेंद्र फुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध सेवा संघ, श्रामनेर सत्यानंद स्मारक समिती व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)