शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीविहिरा गावाने टाकली कात

By admin | Updated: June 27, 2017 01:16 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाली. बदलत्या काळाच्या प्रवाहात गावेही विकासाच्या वाटा चोखांदळत आहेत.

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतर विकास : गाव झाले आष्टी नगर पंचायतचा प्रभागलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाली. बदलत्या काळाच्या प्रवाहात गावेही विकासाच्या वाटा चोखांदळत आहेत. आष्टी तालुक्यातील अवघ्या २५ कुटुंबांचे सिंदीविहिरा हे गावही १०० टक्के विकसित झाले आहे. शासनाच्या विविध विभागांनी निधी देत या गावाला सर्व सुविधायुक्त केल्याचे दिसून येत आहे. धोंगडी यांची शेकडो एकर शेती, मोठा वाडा याच गावात आहे. आष्टीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर हे गाव वसले आहे. या रस्त्यासाठी म्हाळा- मिनी म्हाळा योजनेतून तत्कालीन उपविभागीय अभियंता विवेक पेंढे यांनी ३० लाख रुपये मंजूर करून आणले होते. यात दीड किमी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. उर्वरित ७०० मीटरकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख रुपये प्राप्त झाले होते. रस्त्याचा पूर्ण प्रश्न निकाली निघाला आहे. गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्याच्या बांधकामाकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी १० लाख रुपयांचा निधी दिला होता. शाळा नसल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट होत होती. यासाठी माजी पं.स. उपसभापती विनायक धोंगडी यांनी सर्व शिक्षा अभियानमधून ५ लाख रुपये मंजूर करून घेतले. यातून शाळा, अंगणवाडी, किचन, संरक्षण कुंपण तयार करण्यात आले आहे. या गावात आष्टीचे मोहन चव्हाण यांची शेती आहे. त्यांनी अत्याधुनिक गोठा तयार केला आहे. यात गावरानी कोंबड्यांची पैदास होते. २०० च्या जवळपास मोठे कोंबडे तयार झाले आहे. शिवाय हल्यांच्या टक्करीकरिता (झुंंज) सिंदीविहिरा गाव प्रसिद्ध आहे. शासनाची बंदी असल्यामुळे येथील झुंज बंद होती. आता शंकरपट प्रमाणेच हल्यांची झुंजही सुरू होणार आहे. ही झुंज पाहण्यासाठी गावात हजारो लोक येत होते. आता ही झुंज पुन्हा सुरू होणार असल्याने गावातील रेलचेल वाढणार आहे. गाव निसर्गाच्या सौंदर्यात टेकडीच्या पायथ्याची वसले आहे. वनविभागाचे घनदाट जंगल लागून आहे. गावातील बहुतांश नागरिक स्वावलंबी झाले आहेत. शासनाच्या विकासकामांमुळे हे गाव परिपूर्ण झाले आहे. सिंदीविहिराचा भाग आता आष्टी नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे या परिसराचा घरकूलसारख्या योजनांच्या माध्यमातून विकास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यार्थ्यांची पायपीट थांबलीआष्टी शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असले तरी सिंदीविहिरा गावात शिक्षणाचे कुठलेही माध्यम नव्हते. परिणामी, येथील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती. अनेकांच्या सहकार्यातून आता सिंदीविहिरा गावानेही कात टाकली आहे. या गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे येथील चिमुकल्यांना आता गावातच शिक्षण मिळू लागले आहे. सुशोभित शाळेसह कुंपण भिंतही करण्यात आली आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी प्राप्त झाला असून गावाचा कायापालट झाल्याचेही दिसून येत आहे. गाव झाले स्वावलंबीशासनाच्या विकास कामांमुळे हे गाव स्वावलंबी झाले आहे. काही वर्षांपर्यंत बंद असलेली हेल्यांची झुंज गावात सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांची गदी होणार असून रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे. शिवाय अन्य व्यवसायही गावात सुरू होत असल्याने रोजगार उपलब्ध होणार आहेत.