शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

कपाशीची उलंगवाडी; खरिपाची तयारी

By admin | Updated: April 7, 2017 02:02 IST

खरीप हंगाम संपताच, रब्बीची तयारी, अन् रब्बी हंगाम होताच खरीप हंगामाची पूर्व तयारी असे बळीराजचे चक्र अविरत सुरू आहे.

भर उन्हातही शेतकरी व्यस्त : ट्रॅक्टरच्या वापराकडे कलघोराड : खरीप हंगाम संपताच, रब्बीची तयारी, अन् रब्बी हंगाम होताच खरीप हंगामाची पूर्व तयारी असे बळीराजचे चक्र अविरत सुरू आहे. त्याच्या या चक्रानुसार उन्हाच चटके जाणवताच त्याने खरीपाची तयारी सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. या कामात तो रखरखत्या उन्हातही व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्ष कसही निघो, बळीराजाकडे शेतीची मशागत करणे, बीज रोवणे, त्याचे संगोपण करणे ही कामे आलीच. यातच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करून हातात आलेल्या पिकावर समाधान मानने असा अलिखित नियमच त्याच्याकरिता तयार झाला आहे. उन्ह, पाऊस असो की हिवाळ्याची थंडी, शेताच्या बांधावर सूर्याेदय अन सूर्यास्त पाहणे त्याच्या रोजचे कर्तव्यच. चंद्राच्या उजेडात रात्रीची जागल करून वन्य प्राण्याच्या तावडीतून पिकाची जोपासना करावी लागते, अशी अवस्था बळीराजाची आहे. खरीपातील कपाशीची उलंगवाडी सुरू असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती काढल्या जात आहेत. या पऱ्हाट्या शेतकरी व शेतमजूर सरपणासाठी गोळा करतात. तर गव्हाची मळणी झाली असून चणाही निघाला आहे. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूंगाची पेरणी केल्याने काही भागात हिरवेकंच शेत दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटास भुईमूगाच्या मळणीचा हंगाम सुरू होईल. चारा टंचाईमुळे व बैलजोड्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक शेतकऱ्यांजवळ बैलजोडी राहिलीच नाही. त्यामुळे मशागतीचे कामे ट्रॅक्टरच्या सहायाने केली जात आहेत.(वार्ताहर) सध्याच्या भावबाजीवर ठरते नवे नियोजनशेतकरी पुढील हंगामाचे नियोजन सध्या मिळत असलेल्या शेतमालाच्या दरावर ठरवत असतो. गत वर्षी तुरीला ८ हजार रुपये भाव मिळाल्याने खरीपात तुरीचा पेरा वाढला होता. यंदा मात्र तुरीचा भाव ४ ते ४५०० पर्यंत आहे तर शासकीय खरेदीत अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे नव्या हंगामात तुरीचा पेरा घटण्याचे संकेत मिळत आहेत. या तुलनेत कपाशीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत असून मुंग व उडीदाच्या पेऱ्याचे नियोजन शेतकरी करताना दिसून येत आहेत. शेतकरी बारमाही व्यस्तचसकाळपासून सायंकाळपर्यंत राबराब कष्ट करणारा शेतकरी शेताच्या कामात बारमाही व्यस्तच असतो. उन्हाळ्याच्या दिवसात शेताची नागरणी याला उन्हाळवाही म्हटल्या जाते. यानंतर जांभुळवाही, पाऊस येताच शेताला कुंपणासाठी काट्याच्या फासाची व्यवस्था, शेणखतासाठी भटकंती, नंतर सारे फाडण्याची गडबड, पेरणीची धडपड, पिकाची उगवण होताच डवरणीची घाई, पिकाची वाढ होताच निंदणाची लगबग, तर पिकावरील नुकसान होऊ नये म्हणून रात्रीची शेतात जागल त्यामुळे शेतकरी कामात व्यस्तच असतो.