शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

कपाशीला बोंड, सोयाबीनला शेंगा तरी पीक कर्जासाठी थांंबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:26 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्यापूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.पण, यावर्षी बँकांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही शेतकºयांना पीककर्ज मिळाले नाही. सध्या कपाशीला बोंड तर सोयाबीनला शेंगा लागल्या असतानाही शेतकºयांना पीककर्जासाठी थांबा च मिळत असल्याने सावकराचे दार ठोठावावे लागत आहेत.

ठळक मुद्देपीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्ये ४१ टक्क्यांवरच : शेतकरी सावकाराच्या दारात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्यापूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.पण, यावर्षी बँकांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. सध्या कपाशीला बोंड तर सोयाबीनला शेंगा लागल्या असतानाही शेतकऱ्यांना पीककर्जासाठी थांबा च मिळत असल्याने सावकराचे दार ठोठावावे लागत आहेत.सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी म्हणून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात पीककर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. परंतु यावर्षी बँकानी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाकारल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना ८५० कोटीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. बँकांनी हे उद्दिष्ट्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पुर्ण करणे अपेक्षीत होते.परतू आजच्या घडीलाही बँकांनी ही उद्दिष्टे पूर्ण केलली नाहीत. सध्या जिल्ह्यातील बँकांनी केवळ ३१५ कोटींचे म्हणजे ४१ टक्केच उद्दिष्ट्य गाठले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना हंगामाच्या वेळी पीककर्ज उपलब्ध झाले नसल्याने नातेवाईक व सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले आहे. त्यानंतरही कपाशीला बोंड आणि सोयाबीनला शेंगा पकडायला सुरुवात झाली तरी पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या सौभाग्यवतींंचे मगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. त्यातच कपाशीवरील बोंडअळी आणि सोयाबीनवरील लष्करी अळीने आणखी भर घातली आहे. यावर उपाययोजना करण्यातही शेतकऱ्यांचा खिसा खाली झाला. सध्या पीककर्जाअभावी शेतकरी पुरता गहाण असल्याची स्थिती असून यंदाचे उत्पादनही घटेल. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या बँकावर कारवाई करावीजिल्ह्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. बँक कर्मचाऱ्यांकडून येरझरा मारायला लावतात पण काम होत नाही, अशी ओरडही शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी बँकाचे उंबरठे झिजविले तरीही केवळ ४१ टक्केच पीककर्जाचे उद्दिष्ट्ये गाठले. त्यामुळे पीककर्ज नाकारणाऱ्या तसेच उद्दिष्ट्येपुर्ती न करणाºया बँकावर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्हाधिकारी कारवाई करणार काय?पीककर्जाचे उद्दिष्टे पूर्ण न करणाऱ्या बँक शाखांविरुध्द तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे धास्तावलेल्या बँक शाखांनी आपले उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलली होती. त्यावर्षी साधारणत: ८४ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी शैलेश नवाल बँकांवर कारवाई करणार का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :agricultureशेती