वडनेर येथे समाधान शिबिरात १५ हजार २०४ प्रकरणे निकालीहिंगणघाट : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा. शासन योजनांपासून कोणीही वंचिंत राहू नये म्हणून हिंगणघाट विधानसभा मतदार संघात चार समाधान शिबिर घेवून ३६ हजार ९८८ नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देत त्यांना काम झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र वितरीत केल्याचे समाधान आ. समीर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोलताना व्यक्त केले. वडनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित समाधान शिबिराला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्ग २ चे वर्ग १ रुपांतर दीपक सहारे वाघोली, गणेश परसोडकर ढिवरी पिपरी, कुळ खारीज आदेश मनोहर ढगे नरसिंगपूर, शिधा वाटप पत्रिका पार्बता दांडगे(अपंग) चिंचोळी, पुष्पा जोगे वडनेर, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मुख्याध्यापक राजेंद्र सातपुते वडनेर, आखीव पत्रिका वाटप अनिल मावळे हिंगणघाट, सौर पंप लाभार्थी संजय घारपडे वणी(लहान), कृषी पंप लाभार्थी नामदेव कारकुले वडनेर, समाजकल्याण विभागाचे मिनी ट्रक्टर वाटप देवीदास पाटील शेकापूर (बाई), जमीन सुपीकता निर्देशांक प्रमाणपत्र विनोद वानखेडे वडनेर, चष्मे वाटप आरोग्य विभाग हफीज खान पठाण पिपरी यांना कामाची पुर्तता झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित प्रमाणपत्र ४० स्टॉलच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले. व्यासपीठावर खा. रामदास तडस, जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, वडनेर सरपंच विनोद वानखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. सदस्य वसंत आंबटकर, राणा रणनवरे, प्रा. किरण वैद्य आदी उपस्थित होते.आ. कुणावार पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत शासन जनतेच्या दरबारी हा नागरिकांना दिलेला शब्द सार्थ ठरविण्यासाठी या समाधान शिबिराचे आयोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समाधान शिंबिरासाठी तालुक्यातील १०० गावात दोन महिन्यांपासून कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे अर्ज गोळा केले. त्यापैकी १५ हजार २०४ प्रकरणे या शिबिरात पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.या मतदार संघातील २८ हजार हेक्टर शेतजमीन सिंचन क्षमतेच्या आजनसरा बॅरेजला निधी मंजूर व्हावा. शेतांचे पांदण रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्णत्वास यावे, ग्रामीण भागातील २८ गावात पट्ट्याअभावी घरकुल योजनेपासून वंचित ५६ हजार नागरिकांना हक्काचे पट्ट्यासाठी रेडीरेकनरच्या दरात ७५ टक्के सुट द्यावी, वर्धा जिल्हा बँकेचे महाराष्ट्र को-आॅपरेटीव्ह बँकेत विलीनीकरण करण्यात यावे, सिंदी रेल्वे येथील ड्राय पोर्टच्या कामाला गती द्यावी. शहरालगतच्या उद्योगातील कामगारांना ई एस आय अंतर्गत विमा आरोग्य सेवा मिळावी. हिंगणघाट कापसाची मोठी बाजारपेठ असल्याने येथे टेक्सटाईल पार्कची निर्मिती व १५ वर्षांपासून प्रलंबित अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी पुर्णत्वास आणावी, या प्रश्नांकडे आ. कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी खा. रामदास तडस व जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचीही भाषणे झालीत.(तालुका प्रतिनिधी)योजनेचा प्रकार व वाटप प्रमाणपत्रपारधी समाज शिधापत्रिका - १७भोगवटदार १ चे २ मध्ये रुपांतर - १७,१९१जात प्रमाणपत्र - ११३४आपसी वाटणीपत्र - ८उत्पन्नाचा दाखला - ११६पारधीसमाज जात प्रमाणपत्र - ३४सामाजिक सहाय्य योजना - २२कुळाची नोंद खारीज - ७०९शिधा वाटप - १९९४संजय गांधी निराधार - ४३३ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र - १८८३भूमिअभिलेखची क प्रत - ५०मालमत्ता आखीव पत्रिका - ५००जमीन आरोग्य पत्रिका - १०३६घरकुल योजना - ९९मिनी ट्रॅक्टर - ७अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीचा हातराज्यात समाधान शिबिराचे माध्यमातून मतदार संघातील जनतेचे ३६ हजार ९८८ प्रश्न मार्गी लावण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार समीर कुणावार यांचा कार्य सम्राट आमदार, अशी उपाधी देऊन गौरव केला. दोन महिने अथक परिश्रमातून जनतेची कामे केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलील, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर तहसीलदार दीपक करंडे यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करुन शाबासकी दिली.लाभार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, कुणावार यांच्याकडून जनतेवर पुष्पवर्षावकार्यक्रमात श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी गुलाब तिजारे पिपरी, सुशीला खेकारे, शेकापूर(बाई), पारधी समाजाच्या बुखारी बोसले, संजय निराधार योजनेंंतर्गत नर्मदा बुरांडे वाघोली, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना योगेश नासरे बोपापूर, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वच्छला वाघमारे, छाया सातपुते, सुनीता माळवे, नगरसेविका शारदा पटेल, नीता धोबे, शुभांगी डोंगरे, मनीष देवढे, विठ्ठल गुळघाने, सुनील डोंगरे आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले, तर शिबिराला उपस्थित नागरिकांचे आ. समीर कुणावार यांनी थेट जनतेत जाऊन पुष्पवर्षाव करुन स्वागत केले.मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचा गौरवहिंगणघाट : दोन महिन्यांपासून रात्रंदिवस एक करून परिश्रम घेणाऱ्या जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर, तहसीलदार दीपक कारंडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू व सम्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल करण्यात आला. मंचावर मान्यवरांसह भाजप तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, संजय डेहणे, सुभाष कुंटेवार, प्रफुल्ल बाडे, तुषार आंबटकर, अंकुश ठाकुर, समुद्रपूर नगराध्यक्ष शीला सोनारे आदी उपस्थित होते. आभार तहसीलदार दीपक कारंडे यांनी मानले. नायब तहसीलदार अरविंद हिंगळे व अव्वल कारकून संजय काठपातळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजनबद्ध असल्यामुळे १५ हजार नागरिकांना समाधानपत्र घेताना अडचणी गेल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)
चार शिबिरांतून ३६ हजार नागरिकांना न्याय
By admin | Updated: February 21, 2016 01:16 IST