शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस बंद

By admin | Updated: July 5, 2017 00:26 IST

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

माणिकवाडा-तारासावंगा रस्ता : प्रवास ठरतोय जीवघेणालोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून प्रवास जीवघेणा ठरत आहे. दररोज नुकसान होत असल्याने या मार्गावरील बससेवाही बंद कदण्यात आली आहे. परिणामी, ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहारच प्रभावित झाले आहेत.मागील अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच रत्नपाल पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. वर्धा-अमरावती-नागपूर या तीन जिल्ह्यांच्या सिमा तारासावंगा गावाजवळ आहे. या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, गावकरी सर्व प्रकारच्या वाहनांनी प्रवास करतात. ४ पैकी १ किमी रस्ता व्यवस्थित आहे; पण उर्वरित ३ किमी रस्त्यावरील सरफेस पूर्ण उखडला आहे. यामुळे दुरूस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत जि.प. बांधकाम उपविभाग आर्वीचे उपअभियंता अनिल भडांगे यांच्याकडे अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. त्यांनी निधी नसल्याचे सांगत वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यानंतर लगेच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होण्याची अपेक्षा सरपंच रत्नपाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. तत्सम मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.जि.प. बांधकाम विभागाविरूद्ध ग्रा.पं. चा ठरावजिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात गावकरी एकवटले आहे. रस्त्याची दुरूस्ती होत नसल्याने ग्रामपंचायतीने जि.प. बांधकाम विभागाविपरूद्ध ठराव घेतला आहे. सदर ठराव सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठविण्यात येणार असल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. निधी नसल्याचे कारण देत माणिकवाडा ते तारासावंगा रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक, जिल्हा परिषदेकडून निरूपयोगी साधनांवर अनाठायी खर्च केला जातो. ही बाब ग्रामस्थांच्या जिव्हारी लागत असल्याचे दिसते.खासगी वाहनांचा आधारतारासावंगा गावाला जाणाऱ्या बसफेऱ्या रस्त्याच्या त्रासापायी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सकाळी व रात्री अशा मोजक्या बसेस येतात. परिणमी, दिवसभर प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही. याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे.