शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस बंद

By admin | Updated: July 5, 2017 00:26 IST

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

माणिकवाडा-तारासावंगा रस्ता : प्रवास ठरतोय जीवघेणालोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून प्रवास जीवघेणा ठरत आहे. दररोज नुकसान होत असल्याने या मार्गावरील बससेवाही बंद कदण्यात आली आहे. परिणामी, ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहारच प्रभावित झाले आहेत.मागील अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच रत्नपाल पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. वर्धा-अमरावती-नागपूर या तीन जिल्ह्यांच्या सिमा तारासावंगा गावाजवळ आहे. या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, गावकरी सर्व प्रकारच्या वाहनांनी प्रवास करतात. ४ पैकी १ किमी रस्ता व्यवस्थित आहे; पण उर्वरित ३ किमी रस्त्यावरील सरफेस पूर्ण उखडला आहे. यामुळे दुरूस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत जि.प. बांधकाम उपविभाग आर्वीचे उपअभियंता अनिल भडांगे यांच्याकडे अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. त्यांनी निधी नसल्याचे सांगत वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यानंतर लगेच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होण्याची अपेक्षा सरपंच रत्नपाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. तत्सम मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.जि.प. बांधकाम विभागाविरूद्ध ग्रा.पं. चा ठरावजिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात गावकरी एकवटले आहे. रस्त्याची दुरूस्ती होत नसल्याने ग्रामपंचायतीने जि.प. बांधकाम विभागाविपरूद्ध ठराव घेतला आहे. सदर ठराव सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठविण्यात येणार असल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. निधी नसल्याचे कारण देत माणिकवाडा ते तारासावंगा रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक, जिल्हा परिषदेकडून निरूपयोगी साधनांवर अनाठायी खर्च केला जातो. ही बाब ग्रामस्थांच्या जिव्हारी लागत असल्याचे दिसते.खासगी वाहनांचा आधारतारासावंगा गावाला जाणाऱ्या बसफेऱ्या रस्त्याच्या त्रासापायी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सकाळी व रात्री अशा मोजक्या बसेस येतात. परिणमी, दिवसभर प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही. याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे.