शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

आले सिने कलावंतांचे दिवस

By admin | Updated: October 12, 2014 23:49 IST

विधानसभेचे मैदान मारण्यासाठी रिंगणातील सर्वच उमेदवार प्राण आणि पत पणाला लावत आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे़ केवळ

प्रशांत हेलोंडे - वर्धाविधानसभेचे मैदान मारण्यासाठी रिंगणातील सर्वच उमेदवार प्राण आणि पत पणाला लावत आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे़ केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने उमेदवार रॅली आणि शक्ती प्रदर्शनावर भर देत असल्याचे दिसते़ यात मतदारांचे लक्ष वेधून घेण्याकरिता सिने तारकांचा सहभाग वाढविला जात असल्याचेही दिसून येत आहे़ तत्पूर्वी वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये झालेल्या नेत्यांच्या सभांतील शेरेबाजीने मतदारांचे मनोरंजन केले आहे़ आता निर्णय घेण्याची वेळ मतदारांची असल्याने प्रत्येकच उमेदवार त्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत़मतदारांमध्ये हशा पिकविणारे, टोलेबाजी करणारे, गर्दी खेचणारे आणि मतदारांना खिळवून ठेवणाऱ्यांपैकी विलास देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची कमी या निवडणुकीत महाराष्ट्राने अनुभवली़ असे असले तरी सर्वच नेत्यांनी आपापल्या परीने सभा गाजविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते़ वर्धा जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवाराकरिता अमीत शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत काँगे्रस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तोफ डागली़ शिवाय भाजपचे उमेदवार निवडून आल्यास काय करणार, हे देखील मतदारांना सांगण्याचा प्रयत्न केला़ शिवसेनेच्या उमेदवारांकरिता उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यात आली होती़ त्यांनीही मतदारांना खिळवून ठेवत युती का तुटली, भाजप, काँगे्रस, राष्ट्रवादी कसे राजकारण करीत आहे, यावर भाष्य केले़ मनसेच्या उमेदवाराकरिता राज ठाकरे यांनी सभा घेत युती-आघाडीचे राजकारण आणि मनसेची महाराष्ट्र विकासाची ‘ब्लू-प्रिंट’ यावर प्रकाश टाकत मतदार जोडण्याचा प्रयत्न केला़ राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमदेवाराचा प्रचार करण्यासाठी शरद पवार, अजित पवार, आऱआऱ पाटील व सुप्रिया सुळे यांनी सभा गाजविल्या़ या नेत्यांनीही काँगे्रस, भाजपा आणि शिवसेनेवर तोफ डागली़ काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता अशोक गहलोत, अशोक चव्हाण, दीग्विजय सिंग आदी नेत्यांच्या सभा झाल्या़ या नेत्यांनी काँगे्रस सत्तेत असताना किती विकास झाला आणि विरोधक कसा खोटा प्रचार करतात, यावर भाष्य करीत मतदारांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला़ जिल्ह्यात सुमारे १२ नेत्यांच्या सभा झाल्या़ या नेत्यांनी विविध ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत शेरेबाजी केली़ या सभांमुळे प्रचाराचा फड चांगलाच रंगला होता़ काल-परवापर्यंत सोबत फिरणारी नेतेमंडळी आरोप करीत असल्याने मतदारांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले़नेत्यांच्या सभा झाल्यानंतर आता रॅली, पदयात्रांचे दिवस आले आहेत़ या रॅलीमध्ये शक्ती प्रदर्शन केले जाणार असून मतदारांचे लक्ष वेधण्याकरिता विविध क्लूप्त्यांचा वापरही केला जाणार आहेत़ या कार्यास रविवारपासूनच प्रारंभही करण्यात आल्याचे दिसते़ वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये आजपर्यंत वर्षा उसगावकर, अल्का कुबल, सुनील शेट्टी, शशांक केतकर यांच्यासह सिने पार्श्वगायिका वैशाली माडे यांनी हजेरी लावली़ पदयात्रा, रॅलीमध्ये गर्दी जमावी, मतदारांचे लक्ष वेधून घेता यावे यासाठी सिने कलावंतांना पाचारण केले जात आहे़ यासाठी काही उमेदवार आपल्या हितसंबंधांचा वापर करताना दिसून येतात तर काही उमेदवारांना भरमसाठ पैसा खर्च करून सिने कलावंतांचा सहभाग पदरी पाडून घेत असल्याचेही दिसून येत आहे़ वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, देवळी आणि हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघामध्ये सिने कलावंतांनी हजेरी लावून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला़ चारही मतदार संघात सिने कलावंतांना पाहण्याकरिता गर्दी केल्याचे दिसून आले़ असे असले तरी ही गर्दी मतांमध्ये परावर्तित करण्याकरिता उमेदवारांनाच आपले कसब पणाला लावावे लागणार आहे, हे विशेष!